घराच्या साफसफाईवरून भांडण, पत्नीने पतीच्या कानाचा घेतला चावा, करावी लागली सर्जरी

नवी दिल्ली: दिल्लीच्या सुल्तानपुरी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका महिलेने रागाच्या भरात आपल्या पतीचा कानच कापला. यामुळे कानाचा वरचा भाग वेगळा झाल्याने पतीला सर्जरी करावी लागली. उपचारानंतर त्या व्यक्तीने पत्नीविरोधात केस दाखल केली आहे.


पोलिसांनी पतीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून याबाबतचा तपास सुरू आहे. पीडित व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ती व्यक्ती २० नोव्हेंबरला सकाळी आपल्या घरातील कचरा फेकण्यासाठी बाहेर गेली होती. त्यावेळेस पत्नीने त्याला घर साफ करण्यास सांगितले. जसे ती व्यक्ती घरी परतली तेव्हा पत्नीने भांडण करण्यास सुरूवात केली.


यानंतर पत्नीने त्याला मारण्यास सुरूवात केली. मात्र त्याने तिला धक्का दिला. यानंतर तो घराबाहेर जाण्यास निघाला तेव्हा पत्नीने त्याला मागून पकडले आणि कानाच्या वरच्या भागाचा जोरात चावा घेतला. यानंतर त्या व्यक्तीला मुलगा त्याला मंगोलपुरी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेला. येथे त्याच्यावर सर्जरी करण्यात आली.


पोलिसांच्या माहितीनुसार २० नोव्हेंबरला त्याच रुग्णालयात या हल्ल्याची माहिती मिळाली होती आणि यानंतर एक टीमही आली होती. मात्र पीडित व्यक्ती त्यावेळेस आपला जबाब नोंदवण्याच्या स्थितीत नव्हता. त्यांनी पोलिसांना सांगितले की ते आपला जबाब देण्यासाठी पोलीस ठाण्यात येतील. यानंतर २२ नोव्हेंबरला त्याने पोलिसांशी संपर्क केला आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

Nari Shakti Vandan Sammelan : पंतप्रधान नरेंद्र मोदी नारी शक्ती वंदन संमेलनाच्या माध्यमातून कर्तृत्ववान महिलांशी संवाद साधणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नारी शक्ती वंदन संमेलनाच्या

Earned Leave : कर्मचाऱ्यांना सुट्यांच्या बदल्यात मिळणार पैसे

नवी दिल्ली : देशातील लाखो नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या नव्या लेबर कोडमुळे आता न वापरलेल्या

Asha Bhosle : स्वरस्वामिनी आशा भोसले यांना पंतप्रधान मोदींनी वाहिली खास मराठीतून आदरांजली

मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या

Manipur Violence : उग्रवाद्यांच्या भीषण हल्ल्यात BSF जवान शहीद, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद

मणिपूरच्या (Manipur Violence) उखरुल जिल्ह्यात शुक्रवारी (१० एप्रिल) उग्रवाद्यांच्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ)

Supreme Court : 'मतदान करणे आणि निवडणूक लढवणे हे मूलभूत अधिकार नाहीत'

नवी दिल्ली : मतदानाचा अधिकार किंवा निवडणूक लढवण्याचा अधिकार यांपैकी कोणताही अधिकार हा 'मूलभूत अधिकार' नाही, असे

Ahmedabad Dosa Batter Death : डोसा पीठ प्रकरणात नवीन खुलासा, मुलींच्या मृत्यूपूर्वी आईने उंदीर नाशकाची केली होती खरेदी

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद शहरातील चांदखेडामध्ये राहणाऱ्या प्रजापती कुटुंबातील २ चिमुकल्या बहिणींचा