Indigo: इंडिगोच्या फ्लाईटमध्ये महिलेसोबत घडले असे काही की, सोशल मीडियावर युजर्सची नाराजी

मुंबई: विमानातून प्रवास कऱणे कोणाला आवडत नाही. देशातील बरेचसे लोग फ्लाईटने प्रवास यासाठी करतात ज्यामुळे त्यांचा वेळ वाचतो. सोबतच कम्फर्टही मिळतो. आता असा सवाल आहे की हे सुख प्रत्येकाला मिळते का? सागरिका पटनाईक नावाच्या महिलेने विमान प्रवासाचा असा एक फोटो शेअर केला आहे जे पाहून तुम्हालाही हा प्रश्न नक्कीच पडेल.


पुण्याहून नागपूरच्या दिशेने जाताना सागरिकाच्या फ्लाईटमध्ये जे घडले ते हैराण करणारे होते. इंडिगोच्या विमान क्रमांक ६ई-६७९८मध्ये प्रवास करत असलेल्या सागरिका पटनाईक यांनी विमानातील प्रवासाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून युजर्स चांगलेच भडकले आहेत. त्यांना दिलेल्या सीटवरील कुशनचच गायब आहे. ही बातमी टाईम्स ऑफ इंडियाच्या हवाल्याने देण्यात आली आहे.


 


टीओईशी बोलकाना सागरिकाचे पती सुब्रत पटनायक यांनी सांगितले की त्यांची पत्नी सुरूवातीला सीट कुशन गायब झाल्याने चांगलीच हैराण झाली. याबाबत तिने केबिन क्रूला ही परिस्थिती सांगितली मात्र त्यावेळेस बोर्डिंगची प्रक्रिया सुरू होती, सागरिका यांना उभे राहावे लागले यामुळे इतर प्रवाशांना त्रास झाला.


वाद होऊ नये साठी क्रूच्या एका सदस्याने दुसऱ्या सीटवरचे अतिरिक्त कुशन आणून सोय कून दिली. सोशल मीडिया एक्सवर सुब्रतने एअरलाईन्सबाबत आपला राग व्यक्त केला. तसेच सवाल केला की या सीटवरील कुशन अचानक गायब कसे होऊ शकतात. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये हे ही म्हटले की इंडिगोकडून इतक्या निष्काळजीपणाची अपेक्षा नव्हती.


सुब्रत पटनायक यांनी सोशल मीडिया एक्सवर शेअर केलेल्या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. याला इंडिगोकडूनही गांर्भीयाने घेण्यात आले आहे.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात