Health : थंडीत वाढतो या आजारांचा धोका, अशा लोकांनी जरूर घ्या काळजी

मुंबई: थंडीचा(winter) मोसम सुरू झाला आहे. थंडीचा मोसम खरं तर चांगला वाटतो मात्र अनेकदा आजारपणही(ilness) घेऊन येतो. आरोग्य तज्ञांच्या मते थंडीच्या मोसमात काही खास आजारांचा धोका वाढतो. अशातच लोकांनी आपल्या आरोग्याबाबत(health) जागरूक राहिले पाहिजे. जाणून घेऊया थंडीच्या दिवसांत कोणत्या आजारांचा धोका वाढतो.



थंडीच्या मोसमात होणारे आजार


थंडीच्या मोसमात अनेक प्रकारचे व्हायरस तसेच बॅक्टेरिया अॅक्टिव्ह होतात. हे बॅक्टेरिया श्वासाच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतात आणि आजारी पाडतात. यामुळे श्वासासंबंधीचे आजार वाढतात. ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते त्यांच्यामध्ये इन्फेक्शनचा धोका अधिक असतो.


थंडीच्या दिवसांत कोरडी हवा असल्याने अस्थमा आणि ब्रोंकायटिसचा धोका वाढतो. तसेच मायग्रेनचा त्रासही अधिक जाणवू शकतो. याशिवाय ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास असतो त्यांचा त्रास या मोसमात वाढू शकतो.



या लोकांनी घ्या विशेष काळजी


थंडीच्या दिवसात अशा लोकांनी काळजी घ्यावी ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल.तसेच ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे अशा लोकांनीही आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. छोटी मुलांना या मोसमात न्यूमोनियाचा त्रास होऊ शकतो. यामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे असते. ज्या लोकांना अस्थमा, ब्रोकांयटिस अथवा श्वासासंबंधीच्या आजारांचा त्रास आहे त्यांनीही या थंडीच्या दिवसात आरोग्याबाबत सतर्क राहणे गरजेचे असते.

Comments
Add Comment

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची