Health : थंडीत वाढतो या आजारांचा धोका, अशा लोकांनी जरूर घ्या काळजी

मुंबई: थंडीचा(winter) मोसम सुरू झाला आहे. थंडीचा मोसम खरं तर चांगला वाटतो मात्र अनेकदा आजारपणही(ilness) घेऊन येतो. आरोग्य तज्ञांच्या मते थंडीच्या मोसमात काही खास आजारांचा धोका वाढतो. अशातच लोकांनी आपल्या आरोग्याबाबत(health) जागरूक राहिले पाहिजे. जाणून घेऊया थंडीच्या दिवसांत कोणत्या आजारांचा धोका वाढतो.



थंडीच्या मोसमात होणारे आजार


थंडीच्या मोसमात अनेक प्रकारचे व्हायरस तसेच बॅक्टेरिया अॅक्टिव्ह होतात. हे बॅक्टेरिया श्वासाच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतात आणि आजारी पाडतात. यामुळे श्वासासंबंधीचे आजार वाढतात. ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते त्यांच्यामध्ये इन्फेक्शनचा धोका अधिक असतो.


थंडीच्या दिवसांत कोरडी हवा असल्याने अस्थमा आणि ब्रोंकायटिसचा धोका वाढतो. तसेच मायग्रेनचा त्रासही अधिक जाणवू शकतो. याशिवाय ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास असतो त्यांचा त्रास या मोसमात वाढू शकतो.



या लोकांनी घ्या विशेष काळजी


थंडीच्या दिवसात अशा लोकांनी काळजी घ्यावी ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल.तसेच ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे अशा लोकांनीही आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. छोटी मुलांना या मोसमात न्यूमोनियाचा त्रास होऊ शकतो. यामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे असते. ज्या लोकांना अस्थमा, ब्रोकांयटिस अथवा श्वासासंबंधीच्या आजारांचा त्रास आहे त्यांनीही या थंडीच्या दिवसात आरोग्याबाबत सतर्क राहणे गरजेचे असते.

Comments
Add Comment

‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा'

मुंबई : प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून

विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या नगरसेवकांना आसने टोचू लागली

महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेत होणार सुधारणार गटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रशासनाला दिल्या

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांविरोधात कारवाईला वेग

मुंबई : मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या

मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

खारबाव येथील नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द मुंबई (प्रतिनिधी) : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि

कांजूरमार्ग कारशेडच्या जागेबाबत खासगी विकासकांची याचिका फेटाळली

मुंबई : ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या कांजूरमार्ग

Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'

मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार