Health : थंडीत वाढतो या आजारांचा धोका, अशा लोकांनी जरूर घ्या काळजी

मुंबई: थंडीचा(winter) मोसम सुरू झाला आहे. थंडीचा मोसम खरं तर चांगला वाटतो मात्र अनेकदा आजारपणही(ilness) घेऊन येतो. आरोग्य तज्ञांच्या मते थंडीच्या मोसमात काही खास आजारांचा धोका वाढतो. अशातच लोकांनी आपल्या आरोग्याबाबत(health) जागरूक राहिले पाहिजे. जाणून घेऊया थंडीच्या दिवसांत कोणत्या आजारांचा धोका वाढतो.



थंडीच्या मोसमात होणारे आजार


थंडीच्या मोसमात अनेक प्रकारचे व्हायरस तसेच बॅक्टेरिया अॅक्टिव्ह होतात. हे बॅक्टेरिया श्वासाच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतात आणि आजारी पाडतात. यामुळे श्वासासंबंधीचे आजार वाढतात. ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते त्यांच्यामध्ये इन्फेक्शनचा धोका अधिक असतो.


थंडीच्या दिवसांत कोरडी हवा असल्याने अस्थमा आणि ब्रोंकायटिसचा धोका वाढतो. तसेच मायग्रेनचा त्रासही अधिक जाणवू शकतो. याशिवाय ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास असतो त्यांचा त्रास या मोसमात वाढू शकतो.



या लोकांनी घ्या विशेष काळजी


थंडीच्या दिवसात अशा लोकांनी काळजी घ्यावी ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल.तसेच ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे अशा लोकांनीही आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. छोटी मुलांना या मोसमात न्यूमोनियाचा त्रास होऊ शकतो. यामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे असते. ज्या लोकांना अस्थमा, ब्रोकांयटिस अथवा श्वासासंबंधीच्या आजारांचा त्रास आहे त्यांनीही या थंडीच्या दिवसात आरोग्याबाबत सतर्क राहणे गरजेचे असते.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य