IND vs AUS: प्लेयर ऑफ दी मॅच बनल्यानंतर यशस्वी ऋतुराजला म्हणाला 'सॉरी'

तिरूअनंतपुरम: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-२० सामना तिरूअनंतपुरम येथे खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पुन्हा हरवले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने केवळ टॉस जिंकला याशिवाय त्यांना काही करता आले नाही. भारताला त्यांनी पहिल्यांदा फलंदाजीसाठी निमंत्रित केले आणि भारताने टी-२० फॉरमॅटमधील सर्वाधिक स्कोर बनवला.


भारताने २० षटकांत ४ बाद २३५ धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाच्या संघाला केवळ १९१ धावा करता आल्याय. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ४४ धावांनी हरवले. या सामन्यात प्लेयर ऑफ दी मॅचचा पुरस्कार यशस्वी जायसवालला देण्यात आला. जायसवालने केवळ २५ बॉलमध्ये ५३ धावांची खेळी केली. यात ९ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.



जायसवाल ऋतुराजला का म्हणाला सॉरी


यशस्वीने प्लेयर ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळवल्यानंतर पहिल्या टी-२० मध्ये केलेली आपली चूक स्वीकारली. यानंतर त्याने लगेचच ऋतुराज गायकवाडला सॉरी म्हटले. विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात यशस्वी जायसवाने एक शॉट खेळला आणि वेगाने दोन धावा घेण्यासाठी धावला. पहिली धाव पूर्ण केल्यानंतर त्याने विश्वासाने दुसऱ्या धावेसाठी ऋतुराजला बोलावले आणि अर्ध्या रस्त्यात पोहोचलाही. ऋतुराजनेही त्याच्या कॉलवर विश्वास ठेवला आणि अर्ध्या पिचपर्यंत आला मात्र त्यानंतर यशस्वीला वाटले की त्याला ही धाव पूर्ण करता येणार नाही म्हणून तो मागे परतला. मात्र ऋतुराजकडे कोणतीच संधी नव्हता. त्यामुळे एकही बॉल न खेळता त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.


यशस्वीने दुसऱ्या सामन्यात प्लेयर ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळवल्यानंर सांगितले की, मी सध्या शिकत आहे. गेल्या सामन्यात जे घडले ती माझी चूक होकी. मी ऋतुराजला सॉरी म्हणालो होतो. मी माझी चूक सुधारली. ऋतु मोठा भाऊ चांगला आणि भला माणूस आहे. मी माझ्या फिटनेसवर काम केले आहे. मी आपले शॉट्स डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत आहे.

Comments
Add Comment

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर

भारताची बॉक्सर जॅस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक, रचला इतिहास

नवी दिल्ली: भारताची प्रतिभावान बॉक्सर जैस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात