IND vs AUS: प्लेयर ऑफ दी मॅच बनल्यानंतर यशस्वी ऋतुराजला म्हणाला ‘सॉरी’

Share

तिरूअनंतपुरम: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-२० सामना तिरूअनंतपुरम येथे खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पुन्हा हरवले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने केवळ टॉस जिंकला याशिवाय त्यांना काही करता आले नाही. भारताला त्यांनी पहिल्यांदा फलंदाजीसाठी निमंत्रित केले आणि भारताने टी-२० फॉरमॅटमधील सर्वाधिक स्कोर बनवला.

भारताने २० षटकांत ४ बाद २३५ धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाच्या संघाला केवळ १९१ धावा करता आल्याय. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ४४ धावांनी हरवले. या सामन्यात प्लेयर ऑफ दी मॅचचा पुरस्कार यशस्वी जायसवालला देण्यात आला. जायसवालने केवळ २५ बॉलमध्ये ५३ धावांची खेळी केली. यात ९ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

जायसवाल ऋतुराजला का म्हणाला सॉरी

यशस्वीने प्लेयर ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळवल्यानंतर पहिल्या टी-२० मध्ये केलेली आपली चूक स्वीकारली. यानंतर त्याने लगेचच ऋतुराज गायकवाडला सॉरी म्हटले. विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात यशस्वी जायसवाने एक शॉट खेळला आणि वेगाने दोन धावा घेण्यासाठी धावला. पहिली धाव पूर्ण केल्यानंतर त्याने विश्वासाने दुसऱ्या धावेसाठी ऋतुराजला बोलावले आणि अर्ध्या रस्त्यात पोहोचलाही. ऋतुराजनेही त्याच्या कॉलवर विश्वास ठेवला आणि अर्ध्या पिचपर्यंत आला मात्र त्यानंतर यशस्वीला वाटले की त्याला ही धाव पूर्ण करता येणार नाही म्हणून तो मागे परतला. मात्र ऋतुराजकडे कोणतीच संधी नव्हता. त्यामुळे एकही बॉल न खेळता त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

यशस्वीने दुसऱ्या सामन्यात प्लेयर ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळवल्यानंर सांगितले की, मी सध्या शिकत आहे. गेल्या सामन्यात जे घडले ती माझी चूक होकी. मी ऋतुराजला सॉरी म्हणालो होतो. मी माझी चूक सुधारली. ऋतु मोठा भाऊ चांगला आणि भला माणूस आहे. मी माझ्या फिटनेसवर काम केले आहे. मी आपले शॉट्स डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत आहे.

Recent Posts

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

24 minutes ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

1 hour ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

1 hour ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

2 hours ago

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

8 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

8 hours ago