Murder: किरकोळ वादातून तरुणाची हत्या, तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

सिडको (प्रतिनिधी)- किरकोळ वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून १६ वर्षीय मुलाचे एका वाहनातून अपहरण करण्यात आले होते. यावेळी त्यास मारहाण करत असताना त्याचा मृत्यू झाला असून याप्रकरणी अंबड पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार २४ नोव्हेंबरला मृत राजा गब्बर सिंग याचे संशयितांबरोबर किरकोळ भांडण झाले होते. याचा राग मनात धरून २५ नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास मृत राजा सिंग यास अंबड गाव बसं स्थानक येथून अपहरण करीत त्यास एका खडी क्रेशर येथे नेऊन मारहाण करण्यात आली होती.

ही मारहाण करीत असतांना राजा गब्बर सिंग याचा मृत्यू झाला.तो मृत झाला असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यास संशयतांनी वाडीव-हे परिसरानजीक एका हॉटेल नजीक नेऊन फेकून दिले. सकाळी आठ वाजेच्या सुमारास याच भागात गायी चारणा-या गुराख्यास मृत राजा सिंग दिसल्याने वाडीवऱ्हे पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. या प्रकरणी त्यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.


मात्र राजा सिंग याचे वडील गब्बर सिंग यांनी अंबड पोलिसात अपहरण केल्याबाबत गुन्हा दाखल केला होता. याबाबत चौकशी करताना अंबड पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीदराने दिलेल्या माहिती नुसार मयत राजा सिंग याचे अपहरण करण्यात आले होते. यातील संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी केलेला मारहाणीत राजा सिंग याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरा पर्यत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वसंत खतेले करीत आहेत.

Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून