IND Vs AUS 2nd T20 : भारताचा धावांचा डोंगर, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना झोडले

मुंबई: भारतीय संघ(team india) आपल्या घरात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-२० सामना खेळवला जात आहे. हा सामना तिरूअनंतपुरममध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताने धावांचा डोंगर उभा केला आहे. भारताने पहिल्यांदा गोलंदाजी करताना ४ बाद २३५ धावांचा मोठा डोंगर उभा केला आहे.


भारताच्या पहिल्या तीन जणांनी अर्धशतके ठोकली. गेल्या सामन्यात भारताचे सलामीवीर यशस्वी जयसवाल आणि ऋतुराज गायकवाड मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले होते. मात्र या दोघांनी या सामन्यात दमदार अर्धशतके ठोकली. यशस्वी जयसवालने ५३ धावांची खेळी केली. तर ऋतुराज गायकवाडने ५८ धावा केल्या.


इशान किशनने या सामन्यात ५२ धावा तडकावल्या. या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवला मोठी खेळी करता आली नाही. सूर्याने १९ धावा केल्या. तर रिंकू सिंहने या सामन्यात नाबाद ३१ धावा केल्या. भारताच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची पुरती धुलाई केली.


ऑस्ट्रेलियाच्या नॅथन एलिसने तीन विकेट मिळवल्या. तर मार्कस स्टॉयनिसला एक विकेट मिळवण्यात यश मिळाले.

Comments
Add Comment

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून

सुपरसंडे : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून