मुंबई: भारतीय संघ(team india) आपल्या घरात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-२० सामना खेळवला जात आहे. हा सामना तिरूअनंतपुरममध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताने धावांचा डोंगर उभा केला आहे. भारताने पहिल्यांदा गोलंदाजी करताना ४ बाद २३५ धावांचा मोठा डोंगर उभा केला आहे.
भारताच्या पहिल्या तीन जणांनी अर्धशतके ठोकली. गेल्या सामन्यात भारताचे सलामीवीर यशस्वी जयसवाल आणि ऋतुराज गायकवाड मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले होते. मात्र या दोघांनी या सामन्यात दमदार अर्धशतके ठोकली. यशस्वी जयसवालने ५३ धावांची खेळी केली. तर ऋतुराज गायकवाडने ५८ धावा केल्या.
इशान किशनने या सामन्यात ५२ धावा तडकावल्या. या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवला मोठी खेळी करता आली नाही. सूर्याने १९ धावा केल्या. तर रिंकू सिंहने या सामन्यात नाबाद ३१ धावा केल्या. भारताच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची पुरती धुलाई केली.
ऑस्ट्रेलियाच्या नॅथन एलिसने तीन विकेट मिळवल्या. तर मार्कस स्टॉयनिसला एक विकेट मिळवण्यात यश मिळाले.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…