IPL: हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार, तर 'हा' खेळाडु सांभाळेल गुजरातची धुरा...

हार्दिक पांड्या गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्समध्ये आल्याच्या चर्चांना उधाणं आलं आहे. अश्यातचं हार्दिक पांड्यानंतर शुभमन गिल हा गुजरात टायटन्स पुढचा कर्णधार असा अंदाज वर्तवला जात आहे. गुजरात संघात शुभमन गिलने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या मोसमात गिलने आपल्या बॅटने खूप धावा केल्या आहेत. या विश्वचषकात गिलही भारतीय संघाचा एक भाग होता. अशा परिस्थितीत पांड्या गेल्यानंतर कर्णधारपद शुभमन गिलकडे सोपवले जाईल, अशी चर्चा सुरु आहे.


आता गुजरात टायटन्सनेही पुढचा कर्णधार शुभमन गिल असेल असे संकेत दिले आहेत. गुजरातने पोस्टद्वारे संकेत देत हे स्पष्ट केले आहे. गुजरात टायटन्सने आपल्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शुभमन गिलचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.





या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की, 'जर टीम चांगली कामगिरी करत असेल आणि तुम्ही चांगली कामगिरी करत नसाल, तरीही तुम्ही या टीमला पुढे नेऊ शकता आणि तुम्ही पुढे जाऊ शकता. हार्दिक पांड्या गुजरातमधून मुंबईत आल्याच्या बातम्या चर्चेत असतानाच ही पोस्ट आली आहे

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत