Nitesh Rane : पक्षफोडी आणि घरफोडी करणारा पनवती म्हणजे संजय राऊत!

आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल


मुंबई : क्रिकेट विश्वचषकाच्या (Cricket World Cup) अंतिम सामन्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) अप्रत्यक्षपणे पनवती असं बरळले. त्यामुळे अत्यंत असंबद्ध विधाने करणार्‍या राऊतांना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत. पक्षफोडी आणि घरफोडी करणारा पनवती असा उल्लेख करत नितेश राणे यांनी राऊतांना चांगलीच चपराक लगावली आहे.


नितेश राणे म्हणाले, डिक्शनरीमध्ये पनवती या नावापुढे आता संजय राजाराम राऊतच लिहावं लागेल. हा चपट्या पायाचा जिथे जिथे जातो तिथे एकतर तो पक्ष संपतो नाहीतर तो घर फोडून टाकतो. उद्धव ठाकरेबरोबर तो चिकटला तर आज उद्धव ठाकरेची काय अवस्था झाली आहे बघा. ना घर का ना घाट का, ना पक्ष हातात राहिला ना घर व्यवस्थित चाललंय.


तसंच पवार साहेबांचं पण झालं आहे. पवार साहेबांच्या जवळ हा गेला आणि पवार कुटुंबियांचं काय झालं आहे ते बघा. राष्ट्रवादी काँग्रेससोबत काय झालं आहे ते बघा. याच्या घरचेही याला किती मोठी पनवती मानतात याची माहिती जर बाहेर दिली तर हा तोंडपण दाखवू शकणार नाही. एक्स्प्रेस टॉवरच्या बाथरुममध्ये काही वर्षांअगोदर काय घडलं हे जर माहिती पडलं तर याला किती मोठी पनवती म्हणावं लागेल!, असं नितेश राणे म्हणाले.



संजय राऊतांना उद्देशून नितेश राणे म्हणाले, मोदीजींच्याच आशीर्वादामुळे तुझ्या मालकाचे २०१४ आणि २०१९ ला १८ खासदार निवडून आले, तुझ्या मालकाला सत्ता मिळाली आणि तू भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींना नावं ठेवतो? मग तुझ्या मालकाला जरा सांग लपूनछपून पुन्हा युती करण्याचा जो काही प्रयत्न सुरु आहे, पायघड्या घालण्याचा जो प्रयत्न सुरु आहे, तो तुझा मालक आणि त्याची लोकं का करत आहेत? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.

Comments
Add Comment

मुंबईहून सुटणाऱ्या लोकमान्य टिळक एक्सप्रेसचा अपघात टळला

मुंबई : उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथे एक मोठा रेल्वे अपघात टळला. मुंबईहून भागलपूरला जाणारी लोकमान्य टिळक

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न स्वप्नच रहाणार, ४२६ फ्लॅट्सची सोडत, पण किंमती आवाक्याबाहेर? वाचा A टू Z

मुंबईत ‘घर’ का परवडेना? किंमत ५४ लाखांपासून १ कोटीपर्यंत! मग 'अत्यल्प व अल्प उत्पन्न' गटाचा नेमका अर्थ काय? मुंबई :

मुंबईमध्ये उभारणार आलिशान 'मरिना'! समुद्र पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई बंदर प्राधिकरणाचे महत्त्वाचे पाऊल

मुंबई: मुंबईला लाभलेल्या अथांग समुद्राचा आणि समुद्रकिनाऱ्यांचा, समुद्राशी निगडित उपक्रमांसाठी वापर

मुंबईत इंडिया मेरिटाईम वीक परिषदेचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : दशकभरात केंद्र सरकारने मेरिटाईम अर्थात सागरी अर्थव्यवस्थेत केलेल्या धोरणात्मक सुधारणांमुळे आज भारत

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची झुंजार खेळी! १५९ धावांची खेळी करून रहाणेचं मोठं स्टेटमेंट; रोहित-विराटचा दाखला देत टीम इंडियात पुनरागमनाचा ठोकला दावा

मुंबई : रणजी ट्रॉफी २०२५-२६ (Ranji Trophy 2025-26) हंगामाच्या दुसऱ्या राऊंडमध्ये मुंबई संघ (Mumbai Team) छत्तीसगड (Chhattisgarh) विरुद्ध आपला

Kabutarkhana : 'गरज पडल्यास शस्त्र'...कबुतरखान्यांवरील बंदीवरून जैन समाज पुन्हा आक्रमक; जैन मुनींचा थेट 'आमरण उपोषणाचा' इशारा

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे जैन समाज (Jain Community) आक्रमक झाला आहे. या