IND vs AUS: भारतीय क्रिकेट संघाला मिळाला नवा एमएस धोनी

मुंबई: विश्वचषक संपल्यानंतर आता टीम इंडियाने(india vs australia) ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यास सुरूवात केली आहे. पहिला सामना विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आला. यात भारताने २००हून अधिक धावाच्या आव्हानाचा पाठलाग करताना विजय मिळवला. भारताच्या या विजयात रिंकू सिंहने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने दबावात असताना खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत संयमी खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. रिंकू सिंहची खेळी पाहून पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीची आठवण आली.



रिंकू सिंह खेळला धोनीसारखी खेळी


महेंद्रसिंग धोनीने १५ वर्षे खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत अनेक वेळा विजयी खेळी केल्या आहेत. तसेच आपल्या संघाला कठीण परिस्थितीतून विजय मिळवून दिला आहे. त्याने निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या अंदाजामध्ये खेळणारा खेळाडू मिळत नव्हता. मात्र आता रिंकू सिंहच्या रूपात भारताला पुढील एमएस धोनी मिळाला आहे.


ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडिया २०९ धावाच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत होती. यशस्वी जायसवालने ८ बॉलमध्ये २१ धावांची खेळी करत संघाला एक चांगली सुरूवात करून दिली. मात्र एका चुकीमुळे आपला सहकारी ऋतुराज गायकवाडला बॉल न खेळताच रनआऊट केले.



इशान आणि सूर्याही चमकले


याकारणामुळे टीम इंडियाने केवळ २२ बॉलमध्ये पहिले २ विकेट गमावले होते. मात्र त्यानतंर सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांच्यात जबरदस्त भागीदारी झाली. सूर्यकुमार यादवने ४२ बॉलमध्ये ८० धावा तर इशान किशनने ३९ बॉलमध्ये ५८ धावा केल्या. सूर्या आणि इशानच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलिया विजयापासून दूर झाली मात्र दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने भारताचे ८ विकेट घेत पुन्हा सामन्यात परतण्याचा विचार केला मात्र दुसरीकडे रिंकू सिंह खेळपट्टीवर उभा होता. रिंकू सिंहने १४ बॉलमध्ये २२ धावांची खेळी केली.

Comments
Add Comment

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना