IND vs AUS: भारतीय क्रिकेट संघाला मिळाला नवा एमएस धोनी

  97

मुंबई: विश्वचषक संपल्यानंतर आता टीम इंडियाने(india vs australia) ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यास सुरूवात केली आहे. पहिला सामना विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आला. यात भारताने २००हून अधिक धावाच्या आव्हानाचा पाठलाग करताना विजय मिळवला. भारताच्या या विजयात रिंकू सिंहने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने दबावात असताना खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत संयमी खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. रिंकू सिंहची खेळी पाहून पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीची आठवण आली.



रिंकू सिंह खेळला धोनीसारखी खेळी


महेंद्रसिंग धोनीने १५ वर्षे खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत अनेक वेळा विजयी खेळी केल्या आहेत. तसेच आपल्या संघाला कठीण परिस्थितीतून विजय मिळवून दिला आहे. त्याने निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या अंदाजामध्ये खेळणारा खेळाडू मिळत नव्हता. मात्र आता रिंकू सिंहच्या रूपात भारताला पुढील एमएस धोनी मिळाला आहे.


ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडिया २०९ धावाच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत होती. यशस्वी जायसवालने ८ बॉलमध्ये २१ धावांची खेळी करत संघाला एक चांगली सुरूवात करून दिली. मात्र एका चुकीमुळे आपला सहकारी ऋतुराज गायकवाडला बॉल न खेळताच रनआऊट केले.



इशान आणि सूर्याही चमकले


याकारणामुळे टीम इंडियाने केवळ २२ बॉलमध्ये पहिले २ विकेट गमावले होते. मात्र त्यानतंर सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांच्यात जबरदस्त भागीदारी झाली. सूर्यकुमार यादवने ४२ बॉलमध्ये ८० धावा तर इशान किशनने ३९ बॉलमध्ये ५८ धावा केल्या. सूर्या आणि इशानच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलिया विजयापासून दूर झाली मात्र दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने भारताचे ८ विकेट घेत पुन्हा सामन्यात परतण्याचा विचार केला मात्र दुसरीकडे रिंकू सिंह खेळपट्टीवर उभा होता. रिंकू सिंहने १४ बॉलमध्ये २२ धावांची खेळी केली.

Comments
Add Comment

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण