Health: रिकाम्या पोटी मनुकाचे पाणी पिण्याचे होतात हे फायदे, शरीरात नाही जाणवणार रक्ताची कमतरता

  216

मुंबई: मनुका(raisin) हे असे ड्रायफ्रुट आहे ज्यात भरपूर पोषकतत्वे आहेत. इतर ड्रायफ्रुट्सच्या तुलनेत मनुका स्वस्त दरात मिळतात. मात्र याचे फायदे इतके आहेत की त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. हे असे सुपरफूड आहे ज्यामुळे अनेक आजारांपासून सुटका होऊ शकते.



मनुक्याचे फायदे


आर्यनची कमतरता दूर होते. ज्या लोकांना अॅनिमियाचा त्रास आहे तसेच ज्यांच्या शरीरात हिमोग्लोबिनची समस्या आहे त्यांनी दररोज रिकाम्या पोटी मनुक्याचे पाणी प्यायल्याने खूप फायदा मिळतो.



दात आणि हाडे होतात मजबूत


मनुक्यामध्ये अनेक पोषकतत्वे आहेत. जसे कार्बोहायड्रेट, आर्यन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, व्हिटामिन आणि प्रोटीन पोटॅशियम ही तत्वे दात आणि हाडे मजबूत करण्यास मदत करतात. याच्या सेवनाने दात तसेच हाडांना मजबूती मिळते.



डोळ्यांसाठी फायदेशीर


ज्या लोकांची नजर कमकुवत आहे त्यांनी मनुक्याचे सेवन सुरू केले पाहिजे. कारण यात व्हिटामिन ए, बीटा कॅरोटिन, अँटी ऑक्सिडंट असतात ज्यामुळे डोळ्यांच्या मांसपेशी मजबूत होतात.



हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर


हृदयाचे आजार दूर करण्यासाठी तुम्ही मनुक्याचे सेवन करू शकता. यामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.



दिवसभर राहतो एनर्जेटिक


मनुक्याला कार्बोहायड्रेटचा चांगला स्त्रोत मानला जातो. यात अमिनो अॅसिड असते ज्यामुळे वर्कआऊटनंतर तुम्हाला मसल्स लवकर रिकव्हर होण्यास मदत होते.



वजन नियंत्रणात राहते


मनुक्यामध्ये डाएटरी फायबर आणि प्रोबायोटिक असतात. ही दोन तत्वे पोटात चांगले आणि निरोगी बॅक्टेरिया बनवण्यास मदत करतात. ज्यामुळे वजन नियंत्रित होण्यास मदत होते.



ब्लड प्रेशर नियंत्रणात


मनुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असतात जे शरीराच्या आतील सोडियमचा प्रभाव कमी करू शकतात. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.