IND vs AUS: कर्णधार सूर्यकुमारची जबरदस्त खेळी, पहिल्या टी-२०मध्ये भारताचा विजय

  120

मुंबई: भारतीय संघाने(team india) ऑस्ट्रेलियाविरुद्ध(india vs australia) ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेची सुरूवात विजयासह जबरदस्त केली आहे. मालिकेतील पहिला सामना गुरूवारी विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने या पहिल्या सामन्यात कांगारू संघाला २ विकेटनी मात दिली.


सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने २०९ धावांचे आव्हान दिले होते. याच्या प्रत्युत्तरात उतरलेल्या भारतीय संघाने २२ धावांवर आपले दोनही सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयसवाल यांच्या रूपात आपले दोन विकेट गमावले होते. यानंतर सूर्यकुमार यादवने कर्णधाराला साजेशी खेळी केली. यानंतर त्याने ईशान किशनसह मिळून तिसऱ्या विकेटसाठी ६० बॉलमध्ये ११२ धावांची भागीदारी केली.



रिंकू सिंहने षटकार ठोकत जिंकून दिला सामना


ईशान किशनने ३७ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. हे त्याचे पाचवे अर्धशतक होते. इशानने या सामन्यात ३९ बॉलमध्ये ५८ धावा करत बाद झाला. मात्र दुसऱ्या बाजूने सूर्याची खेळी सुरू होती. त्याने २९ चेंडूत आपले टी-२० अर्धशतक ठोकले. त्याचे हे १६वे अर्धशतक होते. यानंतर सामन्यात ४२ चेंडूत एकूण ८० धावांची खेळी करत सामना जिंकून दिला.


इशानने आपल्या डावात ५ षटकार आणि २ शानदार चौकार लगावले. तर सूर्यकुमारने आपल्या खेळीदरम्यान ४ षटकार आणि ९ दमदार चौकार लगावले. ईशानचा स्ट्राईक रेट १४८.७१ आणि सूर्याचचा १९०.४७ इतका होता. अखेरीस रिंकू सिंहने १४ बॉलमध्ये नाबाद २२ धावा केल्या. शेवटच्या बॉलवर १ धाव हवी होती तेव्हा रिंकूने षटकार ठोकला. मात्र नोबॉल असल्याने षटकार बाद ठरला.

Comments
Add Comment

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे