Wamanrao Pai : अज्ञानातून ज्ञानाकडे...


  • जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै



पैसे मिळवण्यावर तुमचे सुख अवलंबून नाही. सुख मिळणे व सोयी मिळणे या दोन गोष्टी भिन्न आहेत. Comforts of life सुखसोयी मिळवण्यासाठी, शरीराच्या सोयी होण्यासाठी पैसा आवश्यक आहे. सुख हे पैशांवर अवलंबून नाही. विज्ञानाने सर्व सोयी दिल्या म्हणून विज्ञानसुद्धा श्रेष्ठ आहे. पण माणसाला सुखी करण्याचे सामर्थ्य विज्ञानात नाही. विज्ञान काय करू शकेल? माणसाला जास्तीत जास्त सोयी करून देईल. माणूस मोटारीत बसतो व मोटार चालू होते. आता, तर मोटारीसुद्धा चालूबंद बटण दाबले की होतात. विज्ञानाने केलेले पराक्रम हे देदीप्यमान आहेत याबद्दल वाद नाही, तरीसुद्धा विज्ञान माणसाला सुख देण्यास समर्थ नाही. विज्ञान पाहिजेच पण त्याच्या जोडीला प्रज्ञान पाहिजे. अज्ञान मुळीच नको. अज्ञानातून सर्व अनिष्ट गोष्टी निर्माण होतात. दारू पिणे, गुटखा खाणे या सर्व गोष्टी अज्ञानातून निर्माण होतात. आम्ही जेव्हा लोकांना सांगतो, तेव्हा लोक दारू सोडतात. आमच्याकडे एक कामवाली येते. ती नवीन लागली तेव्हा तिला कुणीतरी सांगितलं की, “तू ज्यांच्याकडे कामाला जातेस तिथे संत राहतात, सद्गुरू राहतात.” घरात असताना मी घरच्या कपड्यांवर असतो, तेव्हा तिला कळलेच नाही की इथे कोण संत आहेत. शेवटी तिला कुणीतरी सांगितले की, “अगं सद्गुरू सद्गुरू म्हणतात ते हेच.” तेव्हा ती मला म्हणाली, “महाराज माझा नवरा दारू पितो.” मी तिला म्हटले “तू त्याला माझ्या घरी घेऊन ये.” तिने त्याला आणले व तो आलाही. त्याची काहीतरी पुण्याई असावी. मी त्याला अर्धापाऊण तास मार्गदर्शन केले, समजावून सांगितले. त्याने त्या दिवसापासून दारू सोडली. तिने नंतर काही दिवसांतच आम्हाला सांगितले की, “तिचे दागिनेही त्याने सोडवून आणले. आता घरी आनंदी-आनंद आहे.”



हे मी का सांगतो आहे. लोक अज्ञानात असतात. लोक संगतीने दारू पितात असे आपण म्हणतो. पण संगत कुणाची धरायची याचे सुद्धा ज्ञान असावे लागते. सांगायचा मुद्दा अज्ञान, विज्ञान व प्रज्ञान यांत अज्ञान टाकाऊ, विज्ञान श्रेष्ठ आहे, चांगले आहे, आवश्यक आहे पण ते माणसाला सुख देऊ शकत नाही. उलट वेळ आली, तर दुःखच देते. एक लढाई झाली, तर कुणी जिंकणार नाही व कुणी हरणार नाही. माणूस विज्ञानाच्या बळावर विनाशाकडे जाऊ शकतो व विज्ञानाच्या बळावर सोयी मिळवू शकतो. प्रज्ञान ही एकच गोष्ट अशी आहे की, ते तुम्हाला सुख देऊ शकते म्हणूनच ज्ञान हाच देव. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान “पाहावे आपणासी आपण या नांव ज्ञान” असे समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेले आहे. प्रज्ञान म्हणजे प्रभूचे ज्ञान. हा प्रभू आहे कुठे?



शून्य स्थावर जंगम व्यापून राहिला अकळ
बापरखुमादेवीवरू विठ्ठलू सकळ।



हा आपल्या हृदयांत आहे व तो आपल्याला कळतो. पण तो आपल्याला कळतो, हे सुद्धा आपल्याला कळत नाही.

Comments
Add Comment

Ujjain Mahakaleshwar : महाकालच्या भक्तांसाठी खुशखबर ! आता घरबसल्या घ्या भस्म आरतीचं दर्शन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या दर्शनानं आपल्या आयुष्यातील संकटे आणि

जाणून घ्या चैत्र नवरात्रीत देवीची पूजा, विधी कसे करावेत ? आणि कोणत्या गोष्टी असतात लाभदायक

मुंबई : गुढीपाडवा हा हिंदू पंचांगातील महत्वाचा सण आहे. या सणापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. आणि गुडीपाडवा या

एकादशीच्या दिवशी 'या' गोष्टी केल्यास भगवान विष्णू होतील प्रसन्न !

धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी मनोभावे पूजा

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन

कधी आहे पापमोचनी एकादशी ? काय आहे या दिवसाचे महत्त्व ? कशी करावी या दिवशी पूजा ?

मुंबई : हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी. हा दिवस

कधी आहे नृसिंह द्वादशी ? त्या दिवशी नेमके काय करावे ?

भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजेच भगवान नृसिंह यांची द्वादशी ही यंदा शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा