Dr. Babasaheb Ambedkar : सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा

संविधान दिनी घडणार ऐतिहासिक घटना


नवी दिल्ली : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) प्रांगणात घटनाकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. भारतीयांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र कष्ट करुन भारतीय संविधान लिहिणार्‍या आंबेडकरांचा देशातील कोणत्याच न्यायालयाच्या प्रांगणात पुतळा नव्हता. पहिल्यांदाच असा पुतळा उभारण्यात येणार असल्याने ही ऐतिहासिक घटना असणार आहे.


संविधान दिनी (Constitution Day) २६ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu)यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे. ७ फूट उंचीच्या या पुतळ्यामध्ये डॉ. आंबेडकर यांनी वकिल पोशाख आणि हातात संविधानाची प्रत धारण केली आहे. हरियाणातील मानेसर इथे पुतळ्यांचं काम पूर्ण करण्यात आलं आहे. प्रसिद्ध शिल्पकार नरेश कुमावत यांनी हा पुतळा साकारला आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलात सध्या महात्मा गांधींचा एक पुतळा आहे. जो सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या समोर आहे. गेल्या वर्षी, डिसेंबर महिन्यात तीन वकिलांनी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहून सुप्रीम कोर्टाच्या लॉनवर डॉ. आंबेडकरांचा पुतळा लावण्याची मागणी केली होती. त्यानंतर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर फॉर सोशल जस्टीस’ या संघटनेच्या वतीने या वर्षी एप्रिल महिन्यातही ही मागणी करण्यात आली. यावर्षी सप्टेंबरमध्ये सुप्रीम कोर्ट आर्ग्युइंग कौन्सिल असोसिएशनने देखील (SCACA) पुतळा बसवण्याची मागणी केली होती. सततच्या विनंतीमुळे डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

Comments
Add Comment

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या