World Cup Record: विश्वचषक २०२३मध्ये चौकार, षटकारांचा पाऊस

मुंबई: एकदिवसीय विश्वचषक २०२३(world cup 2023) फलंदाजांसाठी खूपच चांगले ठरले कारण या स्पर्धेत आतापर्यंतच्या हंगामापैकी सर्वाधिक चौकार तसेच षटकार पाहायला मिळाले. १९७५पासून सुरू झालेल्या स्पर्धेपैकी १३वा हंगामा भारतात पार पडला. यात ऑस्ट्रेलियाचा संघ चॅम्पियन ठरला. भलेही फायनलमध्ये भारताच्या पराभवाने कोट्यावधी चाहत्यांचे मन निराश झाले मात्र स्पर्धेदरम्यान झालेल्या चौकार-षटकारांच्या पावसामुळे चाहत्यांचे खूप मनोरंजन केले.


भारताच्या यजमानपदाखाली खेळवण्यात आलेल्या विश्वचषकात सर्वाधिक ६४४ षटकार पाहायला मिळाले. गेल्या १२ हंगामात इतके षटकार ठोकण्यात आले नव्हते. याआधी इंग्लंडच्या भूमीवर खेळवण्यात आलेल्या २०१९च्या विश्वचषकात ४६३ षटकार ठोकले गेले होते. तो एक रेकॉर्डच होता. मात्र यावेळी फलंदाजांनी १८१ अधिक षटकार ठोकत नवा रेकॉर्ड केला. रोहित शर्माने २०२३च्या स्पर्धेत सर्वाधिक ३१ षटकार ठोकले.


याशिवाय स्पर्धेत सर्वाधिक शतकांचा पाऊस पाहायला मिळाला. फलंदाजांनी या स्पर्धेत एकूण ४० शतके पाहायला मिळाली. गेल्या स्पर्धेच्या तुलनेत ही षटके अधिक होती. गेल्या १२ हंगामातील ही सर्वाधिक शतके होती. दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉकने सर्वाधिक ४ शतके ठोकली. तर भारतासाठी विराट कोहलीने ३ शतके ठोकली. याशिवाय न्यूझीलंडचा युवा क्रिकेटर रचिन रवींद्रने ३ शतके ठोकली. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने स्पर्धेतील सर्वात मोठा स्कोर केला होता. अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात मॅक्सवेलने नाबाद २०१ धावा ठोकल्या होत्या.



विराटची सर्वाधिक धावसंख्या


विराट कोहलीने वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा केल्या. भारतीय फलंदाजाने ११ सामन्यांमध्ये ११ डावांत ९५६२च्या सरासरीने ७६५ धावा केल्या. यात ३ शतके आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीला २०२३च्या विश्वचषकात प्लेयर ऑफ दी टूर्नामेंट ठरवण्यात आले. ७६५ धावांसह कोहली या विश्वचषकात सर्वाधिक धावा कऱणारा फलंदाज ठरला.

Comments
Add Comment

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण

सिडनी ODI मध्ये ऑस्ट्रेलिया ऑलआऊट

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियाने आधीच २ - ०

ऑस्ट्रेलियाच्या भारताविरुद्धच्या एकदिवसीय टी-२० संघात मोठे फेरबदल! ग्लेन मॅक्सवेल आणि बेन ड्वार्शुइस अखेरच्या टप्प्यात संघात परतणार

मुंबई: भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेसह आगामी टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात अनेक