Jammu-kashmir : राजौरीमध्ये दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ अधिकाऱ्यांसह ४ शहीद

राजौरी: जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये बाजी माल भागात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन अधिकारी तसेच दोन जवान शहीद झाले आहेत तर एक जवान जखमी झाला आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर उधमपूर रुग्णालयात उपचार सुरू आहे.


शहीद अधिकाऱ्यांचे मृतदेह जंगलातून बाहेर आणण्यात आले आहेत. जम्मूचे आयजी आनंद जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार राजौरीच्या कालाकोट परिसरातील धर्मसाल ठाणे क्षेत्रातील सोलकी गावाचे बाजी माल परिसरात कमीत कमी दोन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. या भागात विशेष सूचना देत घेराबंदी करून तपास अभियान सुरू करण्यात आले होते.


या चकमकीदरम्यान दोन कॅप्टन आणि एक जवान शहीद झाले आहेत. यामुळे गावांत शोककळा पसरली आहे. सेनाने जंगलातील या भागात चारही बाजूंनी घेराबंदी घातली आहे.



काश्मीर पोलीस आणि सेनेच्या जवानांनी परिसराला घेरले


परिसराला केलेल्या घेराबंदीमध्ये काश्मीर पोलीस आणि भारतीय सेनेचे काही जवान तैनात आहेत. त्यांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. जंगलाचा भाग असल्याने येथे दहशतवाद्यांचे ठिकाण शोधणे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्रास हो आहे. दरम्यान, त्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी इतर मार्गही चाचपडले जात आहेत.

Comments
Add Comment

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे

नाताळला गालबोट; महाराष्ट्र, केरळ आिण काही राज्यांत तोडफोडीच्या घटना

नवी दिल्ली : देशभरात ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच, छत्तीसगड, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान