Jammu-kashmir : राजौरीमध्ये दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ अधिकाऱ्यांसह ४ शहीद

  107

राजौरी: जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये बाजी माल भागात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन अधिकारी तसेच दोन जवान शहीद झाले आहेत तर एक जवान जखमी झाला आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर उधमपूर रुग्णालयात उपचार सुरू आहे.


शहीद अधिकाऱ्यांचे मृतदेह जंगलातून बाहेर आणण्यात आले आहेत. जम्मूचे आयजी आनंद जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार राजौरीच्या कालाकोट परिसरातील धर्मसाल ठाणे क्षेत्रातील सोलकी गावाचे बाजी माल परिसरात कमीत कमी दोन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. या भागात विशेष सूचना देत घेराबंदी करून तपास अभियान सुरू करण्यात आले होते.


या चकमकीदरम्यान दोन कॅप्टन आणि एक जवान शहीद झाले आहेत. यामुळे गावांत शोककळा पसरली आहे. सेनाने जंगलातील या भागात चारही बाजूंनी घेराबंदी घातली आहे.



काश्मीर पोलीस आणि सेनेच्या जवानांनी परिसराला घेरले


परिसराला केलेल्या घेराबंदीमध्ये काश्मीर पोलीस आणि भारतीय सेनेचे काही जवान तैनात आहेत. त्यांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. जंगलाचा भाग असल्याने येथे दहशतवाद्यांचे ठिकाण शोधणे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्रास हो आहे. दरम्यान, त्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी इतर मार्गही चाचपडले जात आहेत.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.