Jammu-kashmir : राजौरीमध्ये दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ अधिकाऱ्यांसह ४ शहीद

राजौरी: जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये बाजी माल भागात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन अधिकारी तसेच दोन जवान शहीद झाले आहेत तर एक जवान जखमी झाला आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर उधमपूर रुग्णालयात उपचार सुरू आहे.


शहीद अधिकाऱ्यांचे मृतदेह जंगलातून बाहेर आणण्यात आले आहेत. जम्मूचे आयजी आनंद जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार राजौरीच्या कालाकोट परिसरातील धर्मसाल ठाणे क्षेत्रातील सोलकी गावाचे बाजी माल परिसरात कमीत कमी दोन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. या भागात विशेष सूचना देत घेराबंदी करून तपास अभियान सुरू करण्यात आले होते.


या चकमकीदरम्यान दोन कॅप्टन आणि एक जवान शहीद झाले आहेत. यामुळे गावांत शोककळा पसरली आहे. सेनाने जंगलातील या भागात चारही बाजूंनी घेराबंदी घातली आहे.



काश्मीर पोलीस आणि सेनेच्या जवानांनी परिसराला घेरले


परिसराला केलेल्या घेराबंदीमध्ये काश्मीर पोलीस आणि भारतीय सेनेचे काही जवान तैनात आहेत. त्यांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. जंगलाचा भाग असल्याने येथे दहशतवाद्यांचे ठिकाण शोधणे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्रास हो आहे. दरम्यान, त्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी इतर मार्गही चाचपडले जात आहेत.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे