CWC 2023: विश्वचषक हरल्यानंतरही किंमत वाढली, या पद्धतीने वाढणार भारतीय खेळाडूंची कमाई

मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३च्या फायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचे तोंड पाहावे लागले. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली यामुळे लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या. मात्र चाहत्यांच्या हाती निराशा आली.


दुसरीकडे भारतीय संघाबाबत बोलायचे झाल्यास निश्चितच फायनलमध्ये झालेला पराभव खेळाडूंसाठी निराशाजनक ठरला. मात्र संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केल्यामुळे त्यांना बक्षीस मिळणे नक्की आहे.



जास्त फीची डिमांड


मीडिया रिपोर्ट्सनुसार भले भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरला नाही मात्र सर्व प्रमुख खेळाडूंची कमाई जबरदस्त वाढणार आहे. याचे कारण आहे वर्ल्डकपमधील खेळाडूंच्या जबरदस्त कामगिरीनंतर अनेक खेळाडूंची ब्राँड व्हॅल्यू वाढली आहे.



या कारणामुळे वाढणार आहे व्हॅल्यू


ईटीच्या रिपोर्टनुसार स्पोर्ट्स मार्केटिंग कंपनी राईज वर्ल्डवाईडचे हेड ऑफ स्पॉन्सरशिप सेल्स अँड टॅलेंट निखिल बर्डिया यांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार भले टीम इंडियाच्या खेळाडूंवर वर्ल्डकप जिंकण्याचा टॅग लागला नाही मात्र संपूर्ण स्पर्धेत शानदार खेळाडू हिरो म्हणून समोर आले आहे. यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत नक्कीच वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत