Health Tips: थंड झालेला चहा पुन्हा पुन्हा गरम करून पिताय का? तर हे जरूर वाचा

मुंबई: अनेकांना चहा(tea) प्यायला प्रचंड आवडतो. ही लोक दिवसभरही चहा पिऊ शकतात. अनेकजण तर थंड चहा वारंवार गरम करून पित असतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की असा चहा तुमच्या आरोग्यासाठी चांगला असतो का?


वारंवार प्यायल्याने तुमची हाडे कमकुवत होतात. यामुळे शारिरीकरित्या त्रासदायक ठरू शकतात. अनेकजण चहा बनवून ठेवतात आणि त्यांना चहाची तल्लफ येथे तेव्हा चहा गरम करून पितात. मात्र अशी सवय आपल्या आरोग्यासाठी चांगली असते का?


टाईम्स ऑफ इंडियामध्ये छापलेल्या बातमीनुसार, जर तुम्ही लगेचच बनवलेला चहा तुम्ही १५ ते २० मिनिटांनी गरम करून प्यायलात तर ते ठीक आहे. यात कोणतेही नुकसान नाही. आरोग्य तज्ञांच्या मते नेहमी चहा फ्रेश प्यावा. पुन्हा गरम नाही केला तर ते चांगले.


चहा परत गरम केल्याने यातील चहाचा फ्लेवर, सुगंध आणि तत्वाची हानी होते. आरोग्य तज्ञांच्या मते जर तुम्ही चहा बनवून ४ तास झाले असतील तर तो चहा चुकूनही गरम करू नका. कारण यामुळे शरीरास मोठे नुकसान होऊ शकते. यात बॅक्टेरिया वाढू लागतात. चहा केल्यानंतर एक ते दोन तासांतच बॅक्टेरिया वाढू लागतात. दूधवाली चहामध्ये तर वेगाने बॅक्टेरिया पसरतात.


अनेकांना दुधाची चहा पिणे पसंत करतात. दुधवाल्या चहामध्ये साखरेमुळे बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात वाढत असतात. जेव्हा तुम्ही दूध आणि साखर मिसळून चहा बनवता तेव्हा ती लगेचच थंड आणि खराब होते.

Comments
Add Comment

मुंबईकरांना प्रशिक्षित करण्यासाठी अग्निशमनचा अग्निरक्षक कार्यक्रम सुरू

मुंबई : मुंबईची आपत्कालीन सज्जता आणि सार्वजनिक सुरक्षा मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून,

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बहिणींची महाआरती

मुंबई: शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीतर्फे सोमवार ९ फेब्रुवारीला राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये

वेगवान मेट्रो, पण मोबाईल बंद! अ‍ॅक्वा लाईनवर प्रवाशांचा संताप

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करणारी अ‍ॅक्वा लाईन मेट्रो (मेट्रो-३) सध्या प्रवाशांसाठी

Ameet Satam: मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणार

भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी फुंकला शंख मुंबई (विशेष प्रतिनिधी) "४४ वर्षांनंतर भाजपाचा महापौर मुंबईच्या

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मंगळवारी 'या' भागात होणार पाणी कपात

मुंबई: मुंबईकरांसाठी फार महत्वाची बातमी समोर आली आहे. मंगळवार १० फेब्रुवारी रोजी मुंबईमधल्या अनेक ठिकाणी पाणी

रितू तावडे मुंबईच्या आठव्या महिला महापौर

मुंबई: मुंबई महापालिकेच्या इतिहासात १९५५ पासून ते २०१७ या कालावधीत ७ महिला नगरसेविका महापौर झाल्या आहेत. १९५५ -५६