आम्ही तुमच्यासोबत आहोत, आज आणि नेहमी...पराभवानंतर टीम इंडियाला पंतप्रधान मोदींनी दिला पाठिंबा

  92

अहमदाबाद: आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३च्या अंतिम सामन्यात भारताला हरवत ऑस्ट्रेलियन संघाने सहा विकेटनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा संघ सहाव्यांदा चॅम्पियन ठरला. तर तिसऱ्यांदा खिताब जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले. सोबतच भारताच्या यजमानपदाखाली खेळवण्यात आलेल्या आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ची सांगता भारतासाठी निराशाजनक ठरली.


यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या खेळाडूंचे सांत्वंन केले. त्यांनी लिहिले, प्रिय टीम इंडिया, वर्ल्डकपदरम्यान तुमची प्रतिभा आणि दृढ संकल्प उल्लेखनीय होता. तुम्ही खूपच छान खेळलात आणि देशाला गौरव मिळवून दिलात. आम्ही आज आणि नेहमीच तुमच्यासोबत उभे आहत.


तर काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, टीम इंडिया तुम्ही संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. जिंकलात किंवा हरलात आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. सोबतच विश्वचषकात शानदार विजयासाठी ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन.


रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला सहा विकेट राखत हरवले. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २४१ धावांचे आव्हान दिले होते. मात्र पॅट कमिन्सच्या संघाने हे आव्हान ४३ षटकांतच पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाचा संघ सहाव्यांदा विश्वविजेता ठरला.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी