आम्ही तुमच्यासोबत आहोत, आज आणि नेहमी...पराभवानंतर टीम इंडियाला पंतप्रधान मोदींनी दिला पाठिंबा

अहमदाबाद: आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३च्या अंतिम सामन्यात भारताला हरवत ऑस्ट्रेलियन संघाने सहा विकेटनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा संघ सहाव्यांदा चॅम्पियन ठरला. तर तिसऱ्यांदा खिताब जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले. सोबतच भारताच्या यजमानपदाखाली खेळवण्यात आलेल्या आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ची सांगता भारतासाठी निराशाजनक ठरली.


यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या खेळाडूंचे सांत्वंन केले. त्यांनी लिहिले, प्रिय टीम इंडिया, वर्ल्डकपदरम्यान तुमची प्रतिभा आणि दृढ संकल्प उल्लेखनीय होता. तुम्ही खूपच छान खेळलात आणि देशाला गौरव मिळवून दिलात. आम्ही आज आणि नेहमीच तुमच्यासोबत उभे आहत.


तर काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, टीम इंडिया तुम्ही संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. जिंकलात किंवा हरलात आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. सोबतच विश्वचषकात शानदार विजयासाठी ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन.


रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला सहा विकेट राखत हरवले. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २४१ धावांचे आव्हान दिले होते. मात्र पॅट कमिन्सच्या संघाने हे आव्हान ४३ षटकांतच पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाचा संघ सहाव्यांदा विश्वविजेता ठरला.

Comments
Add Comment

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव