Shivasena Vs Thackeray Group : बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावरील राडा ठाकरे गटाला भोवला...

शिवाजी पार्क पोलिसांकडून मिळाली नोटीस!


मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबर रोजी स्मृतिदिन (Balasaheb Thackeray Death Anniversary) होता. शिवसेनेत पडलेल्या दोन गटांमुळे या दिवशी राडा होणार हे जणू विधीलिखितच होते. तरीही हा राडा टाळण्यासाठी व स्मृतिदिनाला कोणतेही गालबोट लागू नये याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येलाच शिवाजी पार्क (Shivaji park) येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला वंदन करण्यासाठी दाखल झाले. तरीही ठाकरे गटाने (Thackeray Group) जे करायचे तेच केले आणि दोन्ही गटांमध्ये शिवाजी पार्कवर राडा झाला.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्मृतिस्थळावरुन अभिवादन करून बाहेर पडताच ठाकरे गटाचे अनिल देसाई (Anil Desai) आणि अनिल परब (Anil Parab) बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी तिथे दाखल झाले. परब दाखल झाले आणि याच वेळी शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा झाला. पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी केला. ठाकरे गटाने घोषणाबाजी, धक्काबुक्कीला सुरुवात केली असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले. स्मृतिस्थळासमोर सुरू असलेला राडा थांबवण्याऐवजी दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत होते.


दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. प्राथमिक चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. ठाकरे गटाचे पदाधिकारी थोड्याच वेळात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात जाणार आहेत.

Comments
Add Comment

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी

राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला

मंडाळे आशियातील सर्वात मोठा आणि आधुनिक मेट्रो डेपो !

मुंबई : मुंबईच्या मेट्रो वाहतूक यंत्रणेत नवा अध्याय सुरू होत आहे. डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो लाईन २ बी साठी मंडाळे

“जो जीता वही सिकंदर” शरद पवारांच्या बिनबुडाच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार!

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं चित्र समोर

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन