Shivasena Vs Thackeray Group : बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावरील राडा ठाकरे गटाला भोवला...

शिवाजी पार्क पोलिसांकडून मिळाली नोटीस!


मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबर रोजी स्मृतिदिन (Balasaheb Thackeray Death Anniversary) होता. शिवसेनेत पडलेल्या दोन गटांमुळे या दिवशी राडा होणार हे जणू विधीलिखितच होते. तरीही हा राडा टाळण्यासाठी व स्मृतिदिनाला कोणतेही गालबोट लागू नये याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येलाच शिवाजी पार्क (Shivaji park) येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला वंदन करण्यासाठी दाखल झाले. तरीही ठाकरे गटाने (Thackeray Group) जे करायचे तेच केले आणि दोन्ही गटांमध्ये शिवाजी पार्कवर राडा झाला.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्मृतिस्थळावरुन अभिवादन करून बाहेर पडताच ठाकरे गटाचे अनिल देसाई (Anil Desai) आणि अनिल परब (Anil Parab) बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी तिथे दाखल झाले. परब दाखल झाले आणि याच वेळी शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा झाला. पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी केला. ठाकरे गटाने घोषणाबाजी, धक्काबुक्कीला सुरुवात केली असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले. स्मृतिस्थळासमोर सुरू असलेला राडा थांबवण्याऐवजी दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत होते.


दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. प्राथमिक चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. ठाकरे गटाचे पदाधिकारी थोड्याच वेळात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात जाणार आहेत.

Comments
Add Comment

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक