२०-३० धावा आणखी असत्या तर...वर्ल्डकपमध्ये पराभवानंतर रोहित शर्माने व्यक्त केले दु:ख

मुंबई: टीम इंडियाचे वर्ल्डकप(world cup 2023) जिंकण्याचे स्वप्न रविवारी भंग झाले. पराभवानंतर टीम इंडियाचे क्रिकेटर अतिशय दु:खी दिसले. रोहित मैदानातून जाताना भावूक झाला. विराटलाही पराभवाचे दु:ख लपवता आले नाही. जसप्रीत बुमराहने मोहम्मद सिराजला सांभाळण्याचा प्रयत्न केला. कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळालेल्या सहा विकेटच्या पराभवानंतर सांगितले की विश्वचषकाच्या फायनलमध्ये फलंदाजी चांगली झाली नाही ज्यामुळे निकाल आमच्या बाजूने लागला नाही. मात्र त्यांना संपूर्ण संघावर गर्व आहे.

रोहित आणि टीम इंडियाच्या खेळाडूंसह नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर वर्ल्डकपमधील पराभवाचे नैराश्य साफ दिसत होते. रोहितने सामन्यानंतर सांगितले की टीम इंडिया अखेर का चुकली. सामन्यानंतर रोहित म्हणाला, सामन्याचा निकाल भले आमच्याबाजूने लागला नाही मात्र आम्हाला माहीत आहे की आमचा दिवस चांगला नव्हता. मला संघावर गर्व आहे.

अहमदाबादमध्ये पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेला भारतीय संघ २४० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यावर रोहित शर्मा म्हणाला, मी इमानदारीने सांगू तर स्कोरमध्ये आणखी २०-३० धावा जास्त असत्या तर बरे झाले असते. जेव्हा केएल राहुल आणि विराट कोहली फलंदाजी करत होते तेव्हा वाटत होते की आम्ही २७०-२८० पर्यंत पोहोचू मात्र आम्ही सातत्याने विकेट गमावले.

रोहितने सहाव्यांदा ऑस्ट्रेलिया चॅम्पियन झाल्याबद्दल म्हणाला, ऑस्ट्रेलियाने तीन विकेट गमावल्यानंतर मोठी भागीदारी केली. २४० धावा केल्यानंतर आम्हाला वाटत होते की सुरूवातीचे विकेट आमच्या गोलंदाजांनी काढावेत मात्र श्रेय ट्रेविस हेड आणि मार्नस लाबुशेन यांना जाते.

टीम इंडियाचे सामना हरल्यानंतर झाले भावूक


 



विश्वचषकातील अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर भारताचे खेळाडू अतिशय भावूक दिसले.

 
Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत