cricket: सामना पाहण्यास घेतली होती सुट्टी, मॅच हरल्याने तरूणाने केली आत्महत्या

कोलकाता: गुजरातच्या अहमदाबाद स्थित नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवारी खेळवण्यात आलेल्या क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ६ विकेटनी हरवले होते. या पराभवाने दुखी पश्चिम बंगालच्या एका २३ वर्षीय तरूणाने आत्महत्या करत आपले जीवन संपवले. याबाबतची सूचना मृत तरूणाच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांकुडा जिल्ह्यातील बेलियाटोर ठाणे क्षेत्रात सिनेमा हॉलजवळ रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राहुल लोहार असे या मृत तरूणाचे नाव आहे.



कपड्याच्या दुकानात काम करत होता मृत तरूण


राहुलचे नातेवाईक उत्तम सूरने सांगितले की तो त्या परिसरात एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. फायनल पाहण्यासाठी त्याने रविवारी सुट्टी घेतली होती. सूरने सांगितले की ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पराभवाने तो खूप दु:खी होता. त्यामुळेच त्याने आपल्या खोलीत फाशी घेत जीव दिला.



पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू प्रकरण केले दाखल


सूर यांनी दावा केला की त्याच्या जीवनात कोणतीही अशी समस्या नव्ती. पोलिसांनी सांगितले की राहुलचे शव सोमवारी पोस्टमार्टेमसाठी बांकुडा सम्मिलानी मेडिकल कॉलेज तसेच हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूचे प्रकरण दाखल केले. त्याने जेव्हा आत्महत्या केली तेव्हा घरात कोणी नव्हते. पोलिसांनी या प्रकरणी कोणतेही विधान न करता सांगितले की तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला