cricket: सामना पाहण्यास घेतली होती सुट्टी, मॅच हरल्याने तरूणाने केली आत्महत्या

कोलकाता: गुजरातच्या अहमदाबाद स्थित नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवारी खेळवण्यात आलेल्या क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ६ विकेटनी हरवले होते. या पराभवाने दुखी पश्चिम बंगालच्या एका २३ वर्षीय तरूणाने आत्महत्या करत आपले जीवन संपवले. याबाबतची सूचना मृत तरूणाच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांकुडा जिल्ह्यातील बेलियाटोर ठाणे क्षेत्रात सिनेमा हॉलजवळ रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राहुल लोहार असे या मृत तरूणाचे नाव आहे.



कपड्याच्या दुकानात काम करत होता मृत तरूण


राहुलचे नातेवाईक उत्तम सूरने सांगितले की तो त्या परिसरात एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. फायनल पाहण्यासाठी त्याने रविवारी सुट्टी घेतली होती. सूरने सांगितले की ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पराभवाने तो खूप दु:खी होता. त्यामुळेच त्याने आपल्या खोलीत फाशी घेत जीव दिला.



पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू प्रकरण केले दाखल


सूर यांनी दावा केला की त्याच्या जीवनात कोणतीही अशी समस्या नव्ती. पोलिसांनी सांगितले की राहुलचे शव सोमवारी पोस्टमार्टेमसाठी बांकुडा सम्मिलानी मेडिकल कॉलेज तसेच हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूचे प्रकरण दाखल केले. त्याने जेव्हा आत्महत्या केली तेव्हा घरात कोणी नव्हते. पोलिसांनी या प्रकरणी कोणतेही विधान न करता सांगितले की तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन