cricket: सामना पाहण्यास घेतली होती सुट्टी, मॅच हरल्याने तरूणाने केली आत्महत्या

कोलकाता: गुजरातच्या अहमदाबाद स्थित नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवारी खेळवण्यात आलेल्या क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ६ विकेटनी हरवले होते. या पराभवाने दुखी पश्चिम बंगालच्या एका २३ वर्षीय तरूणाने आत्महत्या करत आपले जीवन संपवले. याबाबतची सूचना मृत तरूणाच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांकुडा जिल्ह्यातील बेलियाटोर ठाणे क्षेत्रात सिनेमा हॉलजवळ रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राहुल लोहार असे या मृत तरूणाचे नाव आहे.



कपड्याच्या दुकानात काम करत होता मृत तरूण


राहुलचे नातेवाईक उत्तम सूरने सांगितले की तो त्या परिसरात एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. फायनल पाहण्यासाठी त्याने रविवारी सुट्टी घेतली होती. सूरने सांगितले की ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पराभवाने तो खूप दु:खी होता. त्यामुळेच त्याने आपल्या खोलीत फाशी घेत जीव दिला.



पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू प्रकरण केले दाखल


सूर यांनी दावा केला की त्याच्या जीवनात कोणतीही अशी समस्या नव्ती. पोलिसांनी सांगितले की राहुलचे शव सोमवारी पोस्टमार्टेमसाठी बांकुडा सम्मिलानी मेडिकल कॉलेज तसेच हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूचे प्रकरण दाखल केले. त्याने जेव्हा आत्महत्या केली तेव्हा घरात कोणी नव्हते. पोलिसांनी या प्रकरणी कोणतेही विधान न करता सांगितले की तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

बिहारमध्य राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या