cricket: सामना पाहण्यास घेतली होती सुट्टी, मॅच हरल्याने तरूणाने केली आत्महत्या

कोलकाता: गुजरातच्या अहमदाबाद स्थित नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवारी खेळवण्यात आलेल्या क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ६ विकेटनी हरवले होते. या पराभवाने दुखी पश्चिम बंगालच्या एका २३ वर्षीय तरूणाने आत्महत्या करत आपले जीवन संपवले. याबाबतची सूचना मृत तरूणाच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांकुडा जिल्ह्यातील बेलियाटोर ठाणे क्षेत्रात सिनेमा हॉलजवळ रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राहुल लोहार असे या मृत तरूणाचे नाव आहे.



कपड्याच्या दुकानात काम करत होता मृत तरूण


राहुलचे नातेवाईक उत्तम सूरने सांगितले की तो त्या परिसरात एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. फायनल पाहण्यासाठी त्याने रविवारी सुट्टी घेतली होती. सूरने सांगितले की ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पराभवाने तो खूप दु:खी होता. त्यामुळेच त्याने आपल्या खोलीत फाशी घेत जीव दिला.



पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू प्रकरण केले दाखल


सूर यांनी दावा केला की त्याच्या जीवनात कोणतीही अशी समस्या नव्ती. पोलिसांनी सांगितले की राहुलचे शव सोमवारी पोस्टमार्टेमसाठी बांकुडा सम्मिलानी मेडिकल कॉलेज तसेच हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूचे प्रकरण दाखल केले. त्याने जेव्हा आत्महत्या केली तेव्हा घरात कोणी नव्हते. पोलिसांनी या प्रकरणी कोणतेही विधान न करता सांगितले की तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी