World cup final: भारताच्या विजयासाठी या १० मुलांनी ठेवलेय निर्जला व्रत, म्हणाले...

मुंबई: रविवारी १९ नोव्हेंबरला आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. भारताचा या विश्वचषकात विजय व्हावा आणि तिसऱ्यांदा वर्ल्डकप आपल्याकडे यावा यासाठी संपूर्ण भारतभरातून प्रार्थना केल्या जात आहे. इतकंच नव्हे तर भारताच्या विजयासाठी होम हवन तर अनेक ठिकाणी पुजा अर्चा केल्या जात आहेत. तर मुजफ्फरनगरमध्ये १० मुलांनी निर्जला व्रत ठेवले आहे.


त्यांचे म्हणणे आहे की जोपर्यंत भारताचा विजय होत नाही तोपर्यंत ते काही खाणारही नाहीत आणि पिणारही नाहीत. शिव चौकावर पोहोचून १० तरूणांनी भारताच्या विजयासाठी आधी शिवशंकराची पुजा केली. त्यानंतर संकल्प केला की ते रात्री १२ वाजल्यापासून निर्जला व्रत ठेवतील. या दरम्यान ते काही खाणार-पिणार नाहीत. या तरूणांचे असेही म्हणणे आहे की फायनल सामना जर भारताने हरला तर ते आपल्या जीवनात पुन्हा क्रिकेट सामना पाहणार नाहीत.


फतेहपूरमध्येही भारताच्या विजयाची प्रार्थना करताना सुंदरकांडाचे पठण केल्यानंतर हवन तसेच पुजा केली. फतेहपूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या नेतृत्वात हे सुंदरकांड पठण आणि हवन तसेच पुजा करण्यात आली. युवा खेळाडूंसह महिलांनी हवन पुजा करत टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या.


सेमीफायनलमध्ये भारताने न्यूझीलंडला हरवत अंतिम फेरी गाठली तर दक्षिण आफ्रिकेला हरवत ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरी गाठली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज अंतिम सामना रंगत आहे.

Comments
Add Comment

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.