World cup final: भारताच्या विजयासाठी या १० मुलांनी ठेवलेय निर्जला व्रत, म्हणाले...

  90

मुंबई: रविवारी १९ नोव्हेंबरला आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. भारताचा या विश्वचषकात विजय व्हावा आणि तिसऱ्यांदा वर्ल्डकप आपल्याकडे यावा यासाठी संपूर्ण भारतभरातून प्रार्थना केल्या जात आहे. इतकंच नव्हे तर भारताच्या विजयासाठी होम हवन तर अनेक ठिकाणी पुजा अर्चा केल्या जात आहेत. तर मुजफ्फरनगरमध्ये १० मुलांनी निर्जला व्रत ठेवले आहे.


त्यांचे म्हणणे आहे की जोपर्यंत भारताचा विजय होत नाही तोपर्यंत ते काही खाणारही नाहीत आणि पिणारही नाहीत. शिव चौकावर पोहोचून १० तरूणांनी भारताच्या विजयासाठी आधी शिवशंकराची पुजा केली. त्यानंतर संकल्प केला की ते रात्री १२ वाजल्यापासून निर्जला व्रत ठेवतील. या दरम्यान ते काही खाणार-पिणार नाहीत. या तरूणांचे असेही म्हणणे आहे की फायनल सामना जर भारताने हरला तर ते आपल्या जीवनात पुन्हा क्रिकेट सामना पाहणार नाहीत.


फतेहपूरमध्येही भारताच्या विजयाची प्रार्थना करताना सुंदरकांडाचे पठण केल्यानंतर हवन तसेच पुजा केली. फतेहपूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या नेतृत्वात हे सुंदरकांड पठण आणि हवन तसेच पुजा करण्यात आली. युवा खेळाडूंसह महिलांनी हवन पुजा करत टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या.


सेमीफायनलमध्ये भारताने न्यूझीलंडला हरवत अंतिम फेरी गाठली तर दक्षिण आफ्रिकेला हरवत ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरी गाठली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज अंतिम सामना रंगत आहे.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल