World cup final: भारताच्या विजयासाठी या १० मुलांनी ठेवलेय निर्जला व्रत, म्हणाले...

  94

मुंबई: रविवारी १९ नोव्हेंबरला आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. भारताचा या विश्वचषकात विजय व्हावा आणि तिसऱ्यांदा वर्ल्डकप आपल्याकडे यावा यासाठी संपूर्ण भारतभरातून प्रार्थना केल्या जात आहे. इतकंच नव्हे तर भारताच्या विजयासाठी होम हवन तर अनेक ठिकाणी पुजा अर्चा केल्या जात आहेत. तर मुजफ्फरनगरमध्ये १० मुलांनी निर्जला व्रत ठेवले आहे.


त्यांचे म्हणणे आहे की जोपर्यंत भारताचा विजय होत नाही तोपर्यंत ते काही खाणारही नाहीत आणि पिणारही नाहीत. शिव चौकावर पोहोचून १० तरूणांनी भारताच्या विजयासाठी आधी शिवशंकराची पुजा केली. त्यानंतर संकल्प केला की ते रात्री १२ वाजल्यापासून निर्जला व्रत ठेवतील. या दरम्यान ते काही खाणार-पिणार नाहीत. या तरूणांचे असेही म्हणणे आहे की फायनल सामना जर भारताने हरला तर ते आपल्या जीवनात पुन्हा क्रिकेट सामना पाहणार नाहीत.


फतेहपूरमध्येही भारताच्या विजयाची प्रार्थना करताना सुंदरकांडाचे पठण केल्यानंतर हवन तसेच पुजा केली. फतेहपूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या नेतृत्वात हे सुंदरकांड पठण आणि हवन तसेच पुजा करण्यात आली. युवा खेळाडूंसह महिलांनी हवन पुजा करत टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या.


सेमीफायनलमध्ये भारताने न्यूझीलंडला हरवत अंतिम फेरी गाठली तर दक्षिण आफ्रिकेला हरवत ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरी गाठली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज अंतिम सामना रंगत आहे.

Comments
Add Comment

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे