World Cup 2023: टीम इंडियाच्या विजयासाठी सोनिया गांधींसह अनेक राजकीय नेत्यांकडून शुभेच्छा

मुंबई: क्रिकेट विश्वचषकातील(world cup final) अंतिम सामना रविवारी १९ नोव्हेंबरला होत आहे. देशभरातील क्रिकेट चाहते आजचा हा उत्सव साजरा करण्यासाठी अहमदाबादेत पोहोचले आहेत. या निमित्ताने देशभरातील दिग्गज नेते भारताच्या विश्वचषक विजयासाठी शुभेच्छा देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.


काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी भारतीय संघाला शनिवारी शुभेच्छा दिल्या आणि म्हटले की खेळाने नेहमीच लिंग, क्षेत्र, भाषा, धर्म बाजूला ठेवत एकत्र केले आहे. अहमदाबादमध्ये २०२३च्या विश्वचषक क्रिकेट फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत आहे.


सोनिया गांधींनी आपल्या मेसेजमध्ये म्हटले, प्रिय टीम इंडिया, मी या वर्ल्डकपदरम्यान तुमच्या अविश्वसनीय कामगिरी आणि सर्वोत्कृष्ट टीम वर्कसाठी सगळ्यात आधी शुभेच्छा देत सुरूवात करेन. तुम्ही सातत्याने देशाचे नाव रोशन केले आहे आणि आम्हाला आनंदित होण्याची संधी दिली. तुम्ही जेव्हा फायनल सामन्यासाठी तयार आहात तेव्हा संपूर्ण देश तुमच्या पाठी आहे. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमच्याकडे वर्ल्डकप चॅम्पियन बनण्याची क्षमता आहे. टीम इंडियाला शुभेच्छा. जय हिंद



सपा प्रमुख अखिलेश यादवनीही दिल्या शुभेच्छा


सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटले, आमचा संघ सातत्याने जिंकत आहे. मी फलंदाजांना शुभेच्छा देईल मात्र खासकरून गोलदाजांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. संपूर्ण देशाला आशा आहे की यावेळेस भारत वर्ल्डकप जिंकेल.



असदु्द्दीन औवेसी म्हणाले, आमचा संघ जिंकणार


फायनलमध्ये येणे ही मोठी होष्ट आहे. आम्हाला विश्वास आहे की आम्ही चांगले खेळू आणि जिंकूही. मी आपल्याकडून अनेक शुभेच्छा देतो.



सचिन तेंडुलकर म्हणाला, आज संध्याकाळी आम्ही ट्रॉफी उचलणार


माजी भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर म्हणाला, मी येथे शुभेच्छा घेऊन आलो आहे. मला आशा आहे की संध्याकाळी आम्ही ट्रॉफी उचलू. आम्ही सगळे याच दिवसाची वाट पाहत होतो.



अहमदाबादसाठी रवाना झाली वंदे भारत ट्रेन


आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या फायनल सामन्यासाठी स्पेशल वंदे भारत ट्रेन मुंबई सेंट्रल येथन अहमदाबादसाठी रवाना झाली.


Comments
Add Comment

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण

सिडनी ODI मध्ये ऑस्ट्रेलिया ऑलआऊट

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियाने आधीच २ - ०

ऑस्ट्रेलियाच्या भारताविरुद्धच्या एकदिवसीय टी-२० संघात मोठे फेरबदल! ग्लेन मॅक्सवेल आणि बेन ड्वार्शुइस अखेरच्या टप्प्यात संघात परतणार

मुंबई: भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेसह आगामी टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात अनेक