World cup 2023: कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न मोडले, ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा जिंकला विश्वचषक

  136

अहमदाबाद: विश्वचषक २०२३ स्पर्धा जिंकण्याचे असंख्य भारतीयांचे स्वप्न आज कागांरूंनी मोडले. ऑस्ट्रेलियाने आज विश्वचषकातील फायनल सामन्यात भारताला ६ विकेट राखत जिंकले.ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे हिरो ठरले ट्रेविस हेड आणि मार्नस लाबुशेन.


या खिताबी सामन्यात २४२ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ४७ धावांत केवळ तीन विकेट गमावले होते. यानंतर हेडने १२० चेंडूत १३७ धावा तर लाबुशेनने नाबाद ५८ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वचषक चॅम्पियन बनला आहे.


फायनल सामन्यात भारताच्या कोणत्याही गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. सुरूवातीच्या ओव्हरमध्ये बुमराह आणि शमीने भारताच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र त्यानंतर दोघांनाही काही करता आले नाही. भारताची सुरूवातच निराशाजनक झाली. भारताने टॉस हरल्याने त्यांना पहिल्यांदा फलंदाजी करावी लागली. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ २४० धावा केल्या. सुरूवातीला सलामीवीर रोहित शर्माने फटकेबाजी करताना ४७ धावा केल्या. गिलला केवळ ४ धावा करता आल्या.


भारताच्या फलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी चांगला स्कोर करण्याची अजिबात संधीच दिली नाही. विराट कोहलीने ५४ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यर केवळ ४ धावांवर बाद झाला. केएल राहुलने ६६ धावांची खेळी करत थोडीफार धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. रवींद्र जडेजाने ९ धावा केल्या.तर सूर्यकुमार यादवने १८ धावा केल्या.



भारताचे गोलंदाज अपयशी


भारतीय संघासाठी जसप्रीत बुमराहने ९ षटकांत ४३ धावा खर्च करत २ विकेट मिळवल्या. याशिवाय मोहम्मद शमी आणि सिराजला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल