IND vs AUS Final: रोहितच्या संघाला करावा लागेल कपिल देवसारखा चमत्कार

  90

अहमदाबाद: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने विश्वचषक २०२३च्या फायनलमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताा २४० धावांवर ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज डावाच्या सुरूवातीपासूनच टीम इंडियावर दबाव टाकताना दिसले. भारतासाठी केएल राहुलने सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली. याशिवाय विराट कोहलीने ५४ धावा केल्या. आता भारताला या कमी धावसंख्येच्या आव्हानाला ऑस्ट्रेलियाला रोखावे लागेल. कपिल देवच्या संघाने १९८३च्या वर्ल्डकपमध्ये १८३ धावांचे तुटपुंजे आव्हान असतानाही वर्ल्डकप जिंकला होता.


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या बॅटिंगसाठी उतरलेला भारताचा संघ सुरूवा तीला अडखळताना दिसला. दरम्यान कर्णधार रोहित शर्माने १५१.६१च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ४७ धावांची खेळी कर संघाला चांगली सुरूवात करून दिली. याची संघाला गरज होती. भारताने पहिल्या १० ओव्हरमध्ये २ बाद ८० धावा केल्या होत्या. यानंतर मात्र भारतीय संघावर दबाव येत गेला. यानंतर मात्र ते बाहेर येऊ शकले नाहीत.



ऑस्ट्रेलियाची घातक गोलंदाजी


ऑस्ट्रेलियाकडून या सामन्यात शानदार गोलंदाजी पाहायला मिळाली. मिचेल स्टार्कने ३ विकेट घेतल्या. या दरम्यान त्याने १० षटांत ५५ धावा दिल्या. याशिवाय कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडने २-२ विकेट मिळवल्या. तर ग्लेन मॅक्सवेल आणि अॅड झाम्पाने १-१ विकेट मिळवल्या.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र