IND vs AUS Final: रोहितच्या संघाला करावा लागेल कपिल देवसारखा चमत्कार

अहमदाबाद: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने विश्वचषक २०२३च्या फायनलमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताा २४० धावांवर ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज डावाच्या सुरूवातीपासूनच टीम इंडियावर दबाव टाकताना दिसले. भारतासाठी केएल राहुलने सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली. याशिवाय विराट कोहलीने ५४ धावा केल्या. आता भारताला या कमी धावसंख्येच्या आव्हानाला ऑस्ट्रेलियाला रोखावे लागेल. कपिल देवच्या संघाने १९८३च्या वर्ल्डकपमध्ये १८३ धावांचे तुटपुंजे आव्हान असतानाही वर्ल्डकप जिंकला होता.


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या बॅटिंगसाठी उतरलेला भारताचा संघ सुरूवा तीला अडखळताना दिसला. दरम्यान कर्णधार रोहित शर्माने १५१.६१च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ४७ धावांची खेळी कर संघाला चांगली सुरूवात करून दिली. याची संघाला गरज होती. भारताने पहिल्या १० ओव्हरमध्ये २ बाद ८० धावा केल्या होत्या. यानंतर मात्र भारतीय संघावर दबाव येत गेला. यानंतर मात्र ते बाहेर येऊ शकले नाहीत.



ऑस्ट्रेलियाची घातक गोलंदाजी


ऑस्ट्रेलियाकडून या सामन्यात शानदार गोलंदाजी पाहायला मिळाली. मिचेल स्टार्कने ३ विकेट घेतल्या. या दरम्यान त्याने १० षटांत ५५ धावा दिल्या. याशिवाय कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडने २-२ विकेट मिळवल्या. तर ग्लेन मॅक्सवेल आणि अॅड झाम्पाने १-१ विकेट मिळवल्या.

Comments
Add Comment

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय