India GDP: भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठी वाढ, पहिल्यांदा ४ ट्रिलियन डॉलर पार पोहोचली इकॉनॉमी

नवी दिल्ली: भारताच्या अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक वाढ पाहायला मिळाली आहे. पहिल्यांदा भारताची इकॉनॉमी ४ ट्रिलियन डॉलर पार पोहोचली आहे. यासोबतच भारत जगातील चौथा सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनण्याच्या जवळ पोहोचला आहे. भारताचे ५ ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी मिळवण्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे.


आर्थिक वर्ष २०२३-२४च्या पहिल्या तिमाहीत भारताच्या जीडीपी दरात ७.८ टक्क्यांनी वाढ झाली होती. नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला. शक्तीकांत दास यांनी ३१ ऑक्टोबरला केलेल्या विधानात म्हटले होते की आर्थिक गतिविधी पाहता काही सुरूवातीचे आकडे समोर आले आहे यामुळे मला आशा आहे नोव्हेंबरच्या अखेरीस दुसऱ्या तिमाहीदरम्यान येणारे जीडीपीचे आकडे नक्कीच हैराण करणारे असतील.



चौथी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या जवळ भारत


जीडीपी लाईव्हचे आकडे पाहून समजते की भारताने १८ नोव्हेंबरच्या रात्री उशिराच हे ध्येय गाठले आहे होते आणि पहिल्यांदा भारताने ४ ट्रिलियन डॉलर आकडा पार केला आहे. दरम्यान, भारत आता चौथ्या पायरीपासून दूर आहे. आता जगातील चौथी अर्थव्यवस्था असलेला देश जर्मनी आहे आणि भारत आणि जर्मनीदरम्यानचे अंतर खूप कमी आहे.



टॉप ४ देशांचा जीडीपी


भारत सध्या जगातील पाचवी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. त्यांची अर्थव्यवस्था २६.७ ट्रिलियन डॉलर आहे. यानंतर दुसऱ्या स्थानावर चीन आहे. त्यांच्या अर्थव्यवस्थेचा आकार १९.२४ ट्रिलियन डॉलर इतका आहे. तिसऱ्या स्थानावर जपान आहे. त्यांची अर्थव्यवस्था ४.३९ ट्रिलियन डॉलर आहे. जर्मनी याबाबतीत चौथ्या स्थानावर आहे तर त्यांची अर्थव्यवस्था ४.२८ ट्रिलियन डॉलर आहे.

Comments
Add Comment

आता बोला? एकाच घरात ४,२७१ मतदार!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत मोठी अनियमितता समोर

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या