India GDP: भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठी वाढ, पहिल्यांदा ४ ट्रिलियन डॉलर पार पोहोचली इकॉनॉमी

नवी दिल्ली: भारताच्या अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक वाढ पाहायला मिळाली आहे. पहिल्यांदा भारताची इकॉनॉमी ४ ट्रिलियन डॉलर पार पोहोचली आहे. यासोबतच भारत जगातील चौथा सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनण्याच्या जवळ पोहोचला आहे. भारताचे ५ ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी मिळवण्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे.


आर्थिक वर्ष २०२३-२४च्या पहिल्या तिमाहीत भारताच्या जीडीपी दरात ७.८ टक्क्यांनी वाढ झाली होती. नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला. शक्तीकांत दास यांनी ३१ ऑक्टोबरला केलेल्या विधानात म्हटले होते की आर्थिक गतिविधी पाहता काही सुरूवातीचे आकडे समोर आले आहे यामुळे मला आशा आहे नोव्हेंबरच्या अखेरीस दुसऱ्या तिमाहीदरम्यान येणारे जीडीपीचे आकडे नक्कीच हैराण करणारे असतील.



चौथी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या जवळ भारत


जीडीपी लाईव्हचे आकडे पाहून समजते की भारताने १८ नोव्हेंबरच्या रात्री उशिराच हे ध्येय गाठले आहे होते आणि पहिल्यांदा भारताने ४ ट्रिलियन डॉलर आकडा पार केला आहे. दरम्यान, भारत आता चौथ्या पायरीपासून दूर आहे. आता जगातील चौथी अर्थव्यवस्था असलेला देश जर्मनी आहे आणि भारत आणि जर्मनीदरम्यानचे अंतर खूप कमी आहे.



टॉप ४ देशांचा जीडीपी


भारत सध्या जगातील पाचवी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. त्यांची अर्थव्यवस्था २६.७ ट्रिलियन डॉलर आहे. यानंतर दुसऱ्या स्थानावर चीन आहे. त्यांच्या अर्थव्यवस्थेचा आकार १९.२४ ट्रिलियन डॉलर इतका आहे. तिसऱ्या स्थानावर जपान आहे. त्यांची अर्थव्यवस्था ४.३९ ट्रिलियन डॉलर आहे. जर्मनी याबाबतीत चौथ्या स्थानावर आहे तर त्यांची अर्थव्यवस्था ४.२८ ट्रिलियन डॉलर आहे.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी