India GDP: भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठी वाढ, पहिल्यांदा ४ ट्रिलियन डॉलर पार पोहोचली इकॉनॉमी

  168

नवी दिल्ली: भारताच्या अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक वाढ पाहायला मिळाली आहे. पहिल्यांदा भारताची इकॉनॉमी ४ ट्रिलियन डॉलर पार पोहोचली आहे. यासोबतच भारत जगातील चौथा सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनण्याच्या जवळ पोहोचला आहे. भारताचे ५ ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी मिळवण्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे.


आर्थिक वर्ष २०२३-२४च्या पहिल्या तिमाहीत भारताच्या जीडीपी दरात ७.८ टक्क्यांनी वाढ झाली होती. नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला. शक्तीकांत दास यांनी ३१ ऑक्टोबरला केलेल्या विधानात म्हटले होते की आर्थिक गतिविधी पाहता काही सुरूवातीचे आकडे समोर आले आहे यामुळे मला आशा आहे नोव्हेंबरच्या अखेरीस दुसऱ्या तिमाहीदरम्यान येणारे जीडीपीचे आकडे नक्कीच हैराण करणारे असतील.



चौथी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या जवळ भारत


जीडीपी लाईव्हचे आकडे पाहून समजते की भारताने १८ नोव्हेंबरच्या रात्री उशिराच हे ध्येय गाठले आहे होते आणि पहिल्यांदा भारताने ४ ट्रिलियन डॉलर आकडा पार केला आहे. दरम्यान, भारत आता चौथ्या पायरीपासून दूर आहे. आता जगातील चौथी अर्थव्यवस्था असलेला देश जर्मनी आहे आणि भारत आणि जर्मनीदरम्यानचे अंतर खूप कमी आहे.



टॉप ४ देशांचा जीडीपी


भारत सध्या जगातील पाचवी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. त्यांची अर्थव्यवस्था २६.७ ट्रिलियन डॉलर आहे. यानंतर दुसऱ्या स्थानावर चीन आहे. त्यांच्या अर्थव्यवस्थेचा आकार १९.२४ ट्रिलियन डॉलर इतका आहे. तिसऱ्या स्थानावर जपान आहे. त्यांची अर्थव्यवस्था ४.३९ ट्रिलियन डॉलर आहे. जर्मनी याबाबतीत चौथ्या स्थानावर आहे तर त्यांची अर्थव्यवस्था ४.२८ ट्रिलियन डॉलर आहे.

Comments
Add Comment

ऑपरेशन सिंदूरमुळे जगभरात वाढला भारतीय संरक्षण तंत्रज्ञानाचा डंका; ‘या’ देशाचा ‘आकाश’मध्ये रस

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत

'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारताची गरुडझेप : आता पाकिस्तान-चीनच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर!

नवी दिल्ली: 'ऑपरेशन सिंदूर'मधील यशानंतर भारताने आता मोठी कंबर कसली आहे! शत्रू देशांच्या मनात धडकी भरेल अशी एक

भारत-पाक सीमेवर आढळले दोन मृतदेह, पाकिस्तानी सिम-ओळखपत्रे जप्त

जयपूर: राजस्थानमधील जैसलमेर येथे भारत-पाकिस्तान सीमेवर एक अल्पवयीन मुलगी आणि एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण, पुढील पाच दिवस पावसाचे

मुंबई (प्रतिनिधी) : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी, २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे ८ जुलै रोजी मोसमी

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, आता ४ नव्हे तर रेल्वे सुटण्याच्या इतके तास आधी तयार होणार चार्ट

नवी दिल्ली: तुम्ही जर रेल्वेमधून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता तिकीटिंग आणि रिझर्व्हेशन