India vs Australia: तब्बल २० वर्षांनी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार फायनल मुकाबला

मुंबई: भारताच्या यजमानपदाखाली खेळवला जात असलेला आयसीसी विश्वचषक २०२३ आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीतील संघ ठरले आहेत. हे संघ आहेत भारत आणि ऑस्ट्रेलिया. हे दोन्ही संघ २० वर्षांनी पुन्हा एकदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये आमनेसामने असतील.


याआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २००३ वर्ल्डकपचा फायनल सामना खेळवण्यात आला होता.हा सामना दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये खेळवण्यात आला होता. यात भारतीय संघाला १२५ धावांनी पराभव सहन करावा लागला होता. तेव्हा भारतीय संघाचे नेतृत्व सौरव गांगुलीच्या हातात होते. कांगारूंचे नेतृत्व रिकी पॉटिंग करत होता.



१९ नोव्हेंबरला होणार फायनल


२० वर्षानंतर दोन्ही संघ बदलले आहेत. आता भारतीय संघाची कमान रोहित शर्माच्या हातात आहे तर कांगारूंचे नेतृत्व वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स सांभाळत आहेत. यावेळेस हा खिताबी सामना १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाईल.


२००३मध्ये गांगुलाच्या नेतृत्वात दादागिरी झाली होती. मात्र आता २० वर्षांनी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ खूप बदलले आहेत. यावेळेस भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ तगडी दिसत आहे. यावेळेस वर्ल्डकपमध्ये नव्या भारताची दादागिरी पाहायला मिळेल.


भारतीय संघाने आतापर्यंत आपले १०ही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने १० पैकी ८ सामने जिंकले आहेत. भारतीय संघाने आपल्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडला ७० धावांनी हरवत फायनल गाठली आहे. तर कांगारूच्या संघाने चोकर्स म्हटल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला ३ विकेटनी हरवत फायनलमध्ये प्रवेश केला.


आता ऑस्ट्रेलियाचा संघ ८व्यांदा फायनलमध्ये खेळण्यास उतरणार आहे. त्यांनी आतापर्यंत ७ पैकी पाचवेळा खिताब जिंकला आहे. त्यांना दोन वेळा वेस्ट इंडिज आणि १९९६मध्ये श्रीलंकेविरुद्ध पराभव सहन करावा लागला होता. तर ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक ५ वेळा १९८७, १९९९, २००३, २००७ आणि २०१५मध्ये खिताब जिंकला होता.


तर भारतीय संघाचा विश्वचषकातील चौथा खिताबी सामना आहे. या संघाने १९८३मध्ये कपिल देवच्या नेतृत्वात पहिल्यांदा खिताब जिंकला होता. यानंर २००३मध्ये भारताला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव सहन करावा लागला होता. मात्र २०११मध्ये भारतीय संघाने दुसऱ्यांदा वर्ल्डकप पटकावला. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघ खेळला होता.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या