मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगलेल्या विश्वचषक २०२३च्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारताने ७० धावांनी विजय मिळवत दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ४ बाद ३९७ धावा केल्या होत्या. त्यानंतर मोहम्मद शमीच्या जबरदस्त ७ विकेटच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला हरवत फायनलमधील आपले स्थान पक्के केले आहे.
विश्वचषकाच्या या सामन्यात मोहम्मद शमी पुन्हा एकदा धावून आला. मोहम्मद शमीने घेतलेल्या सात विकेटच्या जोरावर भारताला न्यूझीलंडविरुद्ध विजय साकारता आला. त्याने ५७ धावांत ७ विकेट घेतल्या. त्याच्या या जबरदस्त खेळीच्या जोरावर त्याने भारताला विजय मिळवून दिला.
या सामन्यात श्रेयस अय्यरने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने तुफानी फलंदाजी करताना भारताला मोठी धावसंख्या गाठून दिली. अय्यरने ७० बॉलमध्ये १०५ धावांची खेळी केली.
विराट कोहलीने या सामन्यात एकदिवसीय शतकांचे अर्धशतक ठोकले. त्याने सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा रेकॉर्ड मोडीत काढला. कोहलीने या सामन्यात ११३ बॉलमध्ये ११७ धावा केल्या. त्याने या सामन्यात इतिहास रचला.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…