World cup 2023: भारत दिमाखात फायनलमध्ये, न्यूझीलंडवर जबरदस्त विजय

  108

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगलेल्या विश्वचषक २०२३च्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारताने ७० धावांनी विजय मिळवत दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ४ बाद ३९७ धावा केल्या होत्या. त्यानंतर मोहम्मद शमीच्या जबरदस्त ७ विकेटच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला हरवत फायनलमधील आपले स्थान पक्के केले आहे.

शमी आला धावून


विश्वचषकाच्या या सामन्यात मोहम्मद शमी पुन्हा एकदा धावून आला. मोहम्मद शमीने घेतलेल्या सात विकेटच्या जोरावर भारताला न्यूझीलंडविरुद्ध विजय साकारता आला. त्याने ५७ धावांत ७ विकेट घेतल्या. त्याच्या या जबरदस्त खेळीच्या जोरावर त्याने भारताला विजय मिळवून दिला.

श्रेयसचे झुंजार शतक


या सामन्यात श्रेयस अय्यरने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने तुफानी फलंदाजी करताना भारताला मोठी धावसंख्या गाठून दिली. अय्यरने ७० बॉलमध्ये १०५ धावांची खेळी केली.

कोहलीच्या शतकांचे अर्धशतक


विराट कोहलीने या सामन्यात एकदिवसीय शतकांचे अर्धशतक ठोकले. त्याने सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा रेकॉर्ड मोडीत काढला. कोहलीने या सामन्यात ११३ बॉलमध्ये ११७ धावा केल्या. त्याने या सामन्यात इतिहास रचला.
Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार