IND vs NZ: विराट कोहलीने रचला इतिहास, एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचे अर्धशतक

  126

मुंबई: भारताचा जबरदस्त फलंदाज विराट कोहली आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारा फलंदाज ठराल आहे. कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये आपले ५०वे शतक ठोकत सचिन तेंडुलकरला मागे टाकले.


न्यूझीलंडविरुद्ध विराट कोहलीने शानदार शतकी खेळी केली. विराट कोहली आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर ४९ एकदिवसीय शतके होती. विराटने आता कोहलीलाही मागे टाकले. कोहलीने २७९व्या डावात आपली ५० शतके पूर्ण केली.


कोहलीने या खेळीदरम्यान आणखी काही रेकॉर्ड आपल्या नावे केले. कोहली आता विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक धावा कऱणारा फलंदाजही बनला आहे. कोहलीने ८० धावा करताच त्याने सचिनचा हा रेकॉर्ड तोडला. सचिनने २००३ मध्ये विश्वचषकातल ६७३ धावा केल्या होत्या. कोहली विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक ५०हून अधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. कोहलीने याबाबतीत सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडला. त्याने २००३च्या हंगामात ७ वेळा ५०हून अधिक धावसंख्या केली होती.



बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ


 



कोहलीने एकदिवसीय शतकांचे अर्धशतक पूर्ण करताच विराट कोहलीसाठी खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी कोहलीच्या शतकांचा अर्धशतकीय प्रवास दाखवला आहे.
Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी