IND vs NZ: विराट कोहलीने रचला इतिहास, एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचे अर्धशतक

मुंबई: भारताचा जबरदस्त फलंदाज विराट कोहली आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारा फलंदाज ठराल आहे. कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये आपले ५०वे शतक ठोकत सचिन तेंडुलकरला मागे टाकले.


न्यूझीलंडविरुद्ध विराट कोहलीने शानदार शतकी खेळी केली. विराट कोहली आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर ४९ एकदिवसीय शतके होती. विराटने आता कोहलीलाही मागे टाकले. कोहलीने २७९व्या डावात आपली ५० शतके पूर्ण केली.


कोहलीने या खेळीदरम्यान आणखी काही रेकॉर्ड आपल्या नावे केले. कोहली आता विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक धावा कऱणारा फलंदाजही बनला आहे. कोहलीने ८० धावा करताच त्याने सचिनचा हा रेकॉर्ड तोडला. सचिनने २००३ मध्ये विश्वचषकातल ६७३ धावा केल्या होत्या. कोहली विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक ५०हून अधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. कोहलीने याबाबतीत सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडला. त्याने २००३च्या हंगामात ७ वेळा ५०हून अधिक धावसंख्या केली होती.



बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ


 



कोहलीने एकदिवसीय शतकांचे अर्धशतक पूर्ण करताच विराट कोहलीसाठी खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी कोहलीच्या शतकांचा अर्धशतकीय प्रवास दाखवला आहे.
Comments
Add Comment

T20 World Cup 2026: भारतीय संघाला मोठा झटका; 'हा' खेळाडू स्पर्धेतून बाहेर

मुंबई: आयसीसी पुरुष T२० विश्वचषक २०२६ ची आजपासून (शनिवार, ७ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि