शासनाची फसवणूक करणार्‍या उबाठाच्या अद्वय हिरे यांना भोपाळमध्ये अटक

साडेसात कोटीच्या कर्जप्रकरणी दाखल गुन्ह्यात नाशिक पोलिसांनी घेतले ताब्यात


नाशिक : शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना आज सकाळी भोपाळ येथे ताब्यात घेण्यात आले. त्यांनी मालेगाव येथील रेणुका सूतगिरणीकडून साडेसात कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, मात्र ते न फेडल्याने हा आकडा ३० कोटीच्या घरात पोहोचला आहे. या प्रकरणात त्यांनी शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यामुळे रमजान पुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याशिवाय हिरे कुटुंबातील सदस्यांनी शासनाची फसवणूक करून शिक्षक भरती केल्याचा देखील आरोप आहे. शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील यांनी कोणतीही खातरजमा न करता प्रस्ताव मंजूर केल्याने किरण कुवर यांनी यापूर्वी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात सर्वांना अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे, तथापि रेणुका सूतगिरणी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यामुळे हिरे यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र त्यांचा जामीन नुकताच फेटाळण्यात आला, त्यामुळे पोलीस त्यांच्या मागावर होतं. मालेगाव पोलीस त्यांचा शोध घेत असताना ते भोपाळ येथे असल्याचे समजले, तेथे त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Comments
Add Comment

काळाराम मंदिरात सामुहिक रामरक्षा पठण

नाशिक : नाशिकच्या श्री काळाराम संस्थानतर्फे सुरू असलेल्या वासंतिक नवरात्र महोत्सव २०२६ मध्ये रविवारची सकाळ

नाशिक - जिल्हाधिका-यांनी घेतला सप्तशृंग गड येथे तयारीचा आढावा

नाशिक : वणी गडावरील चैत्र यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज सकाळी सप्तशृंग गड

कोल्हापूरचा धान्य महोत्सव; ‘मिलेट रॅली’ ला उदंड प्रतिसाद

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने कृषी विभागाच्या

‘विकसित भारता’च्या दिशेने वाटचाल करताना ‘स्वस्थ भारत’ घडवणेही तितकेच महत्त्वाचे - उपराष्ट्रपती

- उरुळी कांचन, पुणे येथे निसर्गोपचार आश्रम ८१ वा वर्धापनदिन पुणे : आजच्या वेगवान जीवनशैलीत लोक अनेकदा भौतिक

महालक्ष्मी सरस महिलांसाठी बाजारपेठेचा मोठा ब्रँड - मुख्यमंत्री

नागपूर : महालक्ष्मी सरस प्रदर्शन हे केवळ विक्रीचे ठिकाण नसून महिला बचत गटांसाठी प्रभावी बाजारपेठ म्हणून कार्य

वकिलांना ३ महिने काळ्या कोटापासून मिळणार सुट्टी; जाणून घ्या कारण

पुणे : वाढत्या उष्णतेमुळे वकिलांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या काळात पारंपरिक काळा