IND vs NZ: वनडे क्रिकेटमध्ये ११८ वेळा भारत-न्यूझीलंड आमनेसामने

मुंबई: एकदिवसीय विश्वचषक २०२३मध्ये(world cup 2023) बुधवारी पहिला सेमीफायनलचा सामना १५ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने असतील. वनडे क्रिकेटमध्ये हे ११८व्यांदा असणार आहे जेव्हा दोन संघ एकमेकांसमोर येतील. आतापर्यंत झालेल्या सामन्यांपैकी ५९ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर ५० सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. दोघांमध्ये एक सामना बरोबरीत सुटला तर ७ मुकाबले अनिर्णीत ठरले.


सर्वोच्च धावसंख्या - टीम इंडियाने मार्च २००९मध्ये खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ४ बाद ३९२ हा स्कोर केला होता.


सर्वात कमी धावसंख्या - ऑक्टोबर २०१६मध्ये खेळवण्यात आलेल्या विशाखापट्टणम येथील वनडे सामन्यात भारताचा संघ अवघ्या ७९ धावांवर सर्वबाद झाला होता.


सगळ्यात मोठा विजय - न्यूझीलंडच्या संघाने भारतीय संघाला २०० धावांनी हरवले आहे. दाम्बुलामध्ये ऑगस्ट २०१०मध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाला हा पराभव सहन करावा लागला.


सगळ्यात छोटा विजय - वेलिंग्टनमध्ये १९९०मध्ये भारताने न्यूझीलंडला एका धावेने हरवले होते.


सर्वाधिक धावा - भारत-न्यूझीलंड वनडे सामन्यात सचिन तेंडुलकरने १७५० धावा केल्यात..


सर्वाधिक शतक - माजी भारतीय क्रिकेट वीरेंद्र सेहवागने न्यूझीलंडविरुद्ध ६ वनडे शतक ठोकले आहेत.


सर्वाधिक विकेट - भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने ५१ विकेट काढल्या होत्या.


सर्वाधिक कॅच - न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज रॉस टेलरने भारताविरुद्ध वनडे सामन्यात १९ कॅच घेतले आहेत.

Comments
Add Comment

हर्षित राणाची जागा जाणार? टीम इंडियात आणखी एका खेळाडूचे पुनरागमन !

मुंबई : टीम इंडियामध्ये आणखी एक वरिष्ठ खेळाडू संघात परतण्याच्या तयारीत असून, त्याच्या पुनरागमनामुळे मुख्य

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची प्रकृती सुधारतेय: भारतात कधी परतणार?

ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा एकदा दुखापतीच्या संकटात सापडला आहे. नुकताच

भारत - ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना २९ ऑक्टोबरला, पहा टीम इंडियाची संभाव्य Playing XI

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला. ही मालिका ऑस्ट्रेलियाने २-१

बाईपण भारी देवा ! ७ महिन्यांची गरोदर तरीही १४५ किलो वजन उचलत जिंकली वेटलिफ्टिंग स्पर्धा

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नसत फक्त जिद्द असायला हवी . दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे सिद्ध

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन

श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर

गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही