Mumbai Pollution : प्रदूषणाची ऐसी की तैसी : कोर्टाचे निर्देश आणि पालिकेचे नियम धाब्यावर...

हवेची गुणवत्ता पातळी भयंकर खालावली... पोहोचली ३०० जवळ


दिल्लीतही प्रदूषणाने गाठली धोकादायक पातळी


मुंबई : मुंबईत प्रदूषणाचे (Mumbai Pollution) प्रमाण प्रचंड वाढल्याने मुंबई महापालिकेने (BMC) दिवाळीदरम्यान (Diwali) नागरिकांसाठी काही नियमांची आखणी करुन दिली होती. दिवाळीत फोडण्यात येणार्‍या फटाक्यांमुळे (Crackers) तर अनेकांना श्वसनाचे विकार उद्भवतात. मात्र, या गोष्टींची जाण असूनही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईकरांनी प्रदूषण नियंत्रणाचे नियम चांगलेच धाब्यावर बसवल्याचे दिसून आले. यामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी (Air Quality Index) २८८ वर पोहोचली, जी अतिशय गंभीर आहे.


मुंबईकरांसाठी रात्री ८ ते १० या वेळेत फटाके फोडण्याची परवानगी देण्यात आली होती. फक्त पालिकेचेनेच नव्हे तर दोन तासच फटाके फोडावे असे स्पष्ट निर्देश कोर्टाने दिले होते. मात्र संध्याकाळी लवकरच फटाके फोडण्यास सुरुवात झाली. शिवाय सकाळच्या वेळेत आणि मध्यरात्रीही हे फटाके फोडणे सुरुच होते. माहितीनुसार, तब्बल १५० कोटींचे फटाके केवळ मुंबईतच फोडले गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईकरांना वाढत चाललेल्या प्रदूषणाची जाण कधी येणार हा एक मोठा प्रश्नच आहे.


गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता काहीशी नियंत्रणात होती. मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडून बांधकामे स्थगित करण्यासाठीचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे दिवाळीआधी मुंबईच्या हवेची पातळी काहीशी सुधारली होती. पण, आता दिवाळीमध्ये हवेची पातळी पुन्हा घसरली आहे आणि याला मुंबईकर देखील जबाबदार आहेत.



दिल्लीतही प्रदूषणाने गाठली धोकादायक पातळी


दिल्लीत (Delhi Pollution) दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता पातळी (AQI) पुन्हा एकदा वाईट श्रेणीत पोहोचली आहे. पाटणा, बिहारमध्ये तर ती अत्यंत वाईट श्रेणीत म्हणजे ३७० वर पोहोचली आहे. सोमवारी पहाटे दिल्ली-एनसीआरमध्ये धुराचे लोट दिसून आले. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसानंतर प्रदूषणाच्या पातळीत सुधारणा झाली होती, त्यानंतर पुन्हा एकदा दिल्लीची हवा पुन्हा खराब झाली आहे. सोमवारी सकाळपर्यंत दिल्लीतील पातळी ५१४ वर होती, ही अत्यंत गंभीर श्रेणी आहे.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महापालिका आयुक्त भिडे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांची घेतली काळजी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उष्माघात, निर्जलीकरण (डिहायड्रेशन) आणि उष्णतेमुळे होणाऱ्या इतर आरोग्य समस्यांपासून

Mumbai Fire Brigade : मुंबईत वाढत्या उन्हामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ, अग्निशमन दलाने केले दक्षतेचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या तापमानामुळे घरांमध्ये, कार्यालयांमध्ये तसेच

CM Student Science Wari : 'मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी' उपक्रमाला शासनाची मान्यता

मुंबई : ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाअंतर्गत राज्यातील विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट

Gymkhana : राज्यातील जिमखान्यांच्या भाडेपट्ट्याबाबत लवकरच नवीन धोरण

मुंबई : मुंबई शहरासह संपूर्ण राज्यातील शासकीय जमिनींवर उभारण्यात आलेल्या जिमखान्यांचे भाडेपट्टे संपुष्टात

मुंबई वॉटर मेट्रोच्या आराखड्याला गती ,मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

काल्हेर, वाशी, गेट वे ऑफ इंडिया आणि नवी मुंबई विमानतळ स्थानकांचा समावेश मुंबई : मुंबईकरांना गर्दी आणि वाहतूक

BMCT : बीएमसीटीमध्ये ११३ स्थानिक सुरक्षारक्षकांना कामावरून कमी; विधानसभा उपाध्यक्षांनी मागविला अहवाल

मुंबई : भारत मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) येथे कार्यरत असलेल्या स्थानिक प्रकल्पग्रस्त ११३ सुरक्षारक्षक