IND vs NED: सेमीफायनलआधी टीम इंडियाचे टेन्शन वाढले

मुंबई: एकदिवसीय विश्वचषक २०२३मधील शेवटचा लीग सामना भारत आणि नेदरलँड्स यांच्यात रंगत आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना रंगत आहे. या सामन्यानंतर टीम इंडिया १५ नोव्हेंबरला न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनलचा सामना खेळणार आहे. मात्र त्याआधी मोहम्मद सिराजच्या दुखापतीने टीम इंडियाचे टेन्शन वाढवले आहे. कॅच घेताना मोहम्मद सिराज दुखापतग्रस्त झाला आणि मैदानाबाहेर गेला.


डावाच्या १५व्या ओव्हरमध्ये कुलदीप यादवच्या बॉलवर मोहम्मद सिराजकडून कॅच सुटला. मात्र या कॅचने सिराजला दुखापतग्रस्त केले. उंच उडालेला कॅच घेतला सिराजने आपले दोन्ही हात गळ्याच्या अतिशय जवळ ठेवले होते. बॉल सिराजच्या हातून खाली पडत सरळ त्याच्या गळ्याला लागली. यामुळे त्याला त्रास होऊ लागला.


या घटनेनंतर सिराज मैदानाबाहेर गेला. ही घटना १५व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर घडली. यावेळी सिराजने कुलदीपच्या बॉलवर डच फलंदाज मॅक्स ओडाऊडचा कॅच सोडला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आयसीसीकडून शेअर करण्यात आला आहे.



अय्यर आणि राहुलची बॅट तळपली


सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघाने ५० षटकांत ४ बाद ४१० धावा केल्या. संघासाठी टॉप ५ फलंदाजांनी ५० धावांचा आकडा पार केला. मात्र चार नंबरच्या श्रेयस अय्यर आणि पाचव्या नंबरवर आलेल्या केएल राहुलने शतक ठोकले. अय्यरने नाबाद खेळी करताना ९४ बॉलमध्ये १० चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १२८ धावांची नाबाद खेळी केली. तर राहुलने ६४ बॉलमध्ये ११ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०२ धावांची खेळी केली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी २०८ धावांची भागीदारी केली. ही भारतासाठी विश्वचषकातील चौथे अथवा त्याखालील स्थानासाठीच्या विकेटसाठी सगळ्यात मोठी भागीदारी ठरली.

Comments
Add Comment

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना