IND vs NED: सेमीफायनलआधी टीम इंडियाचे टेन्शन वाढले

  79

मुंबई: एकदिवसीय विश्वचषक २०२३मधील शेवटचा लीग सामना भारत आणि नेदरलँड्स यांच्यात रंगत आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना रंगत आहे. या सामन्यानंतर टीम इंडिया १५ नोव्हेंबरला न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनलचा सामना खेळणार आहे. मात्र त्याआधी मोहम्मद सिराजच्या दुखापतीने टीम इंडियाचे टेन्शन वाढवले आहे. कॅच घेताना मोहम्मद सिराज दुखापतग्रस्त झाला आणि मैदानाबाहेर गेला.


डावाच्या १५व्या ओव्हरमध्ये कुलदीप यादवच्या बॉलवर मोहम्मद सिराजकडून कॅच सुटला. मात्र या कॅचने सिराजला दुखापतग्रस्त केले. उंच उडालेला कॅच घेतला सिराजने आपले दोन्ही हात गळ्याच्या अतिशय जवळ ठेवले होते. बॉल सिराजच्या हातून खाली पडत सरळ त्याच्या गळ्याला लागली. यामुळे त्याला त्रास होऊ लागला.


या घटनेनंतर सिराज मैदानाबाहेर गेला. ही घटना १५व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर घडली. यावेळी सिराजने कुलदीपच्या बॉलवर डच फलंदाज मॅक्स ओडाऊडचा कॅच सोडला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आयसीसीकडून शेअर करण्यात आला आहे.



अय्यर आणि राहुलची बॅट तळपली


सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघाने ५० षटकांत ४ बाद ४१० धावा केल्या. संघासाठी टॉप ५ फलंदाजांनी ५० धावांचा आकडा पार केला. मात्र चार नंबरच्या श्रेयस अय्यर आणि पाचव्या नंबरवर आलेल्या केएल राहुलने शतक ठोकले. अय्यरने नाबाद खेळी करताना ९४ बॉलमध्ये १० चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १२८ धावांची नाबाद खेळी केली. तर राहुलने ६४ बॉलमध्ये ११ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०२ धावांची खेळी केली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी २०८ धावांची भागीदारी केली. ही भारतासाठी विश्वचषकातील चौथे अथवा त्याखालील स्थानासाठीच्या विकेटसाठी सगळ्यात मोठी भागीदारी ठरली.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार