Ayodhya Ram mandir : अयोध्येत राम मंदिर उद्घाटनासाठी आमदार नितेश राणे यांच्याकडून दोन रेल्वेंची व्यवस्था...

कणकवली : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील राम मंदिराचे (Ayodhya Ram mandir) काम आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. जानेवारी महिन्यात २२ तारखेला या मंदिराचे भव्य उद्घाटन (Ram Mandir Inauguration) पार पडणार आहे. या उद्घाटनाचे प्रसारण देश-विदेशात लाईव्ह (Live) केले जाणार आहे. देशातील सगळ्या राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जाणार आहे. देशातील प्रसिद्ध क्रीडापटू, साहित्यिक, वरिष्ठ पत्रकारांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. शिवाय देशातील अनेक रामभक्त आणि हिंदू नागरिक या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत.


महाराष्ट्रातून देखील मोठ्या संख्येने हिंदूंनी राम मंदिराच्या उद्घाटनाकरता जमावे आणि 'याचि देही याचि डोळा' सोहळा पाहावा यासाठी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh rane) यांनी दोन रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली आहे. कणकवली, देवगड आणि वैभववाडी विधानसभा क्षेत्रातील सर्व रामभक्तांना अयोध्येला जाण्यासाठी या गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्या सोशल मीडियावरुन नितेश राणे यांनी यासंबंधी पोस्ट करत घोषणा केली आहे.


या दोन्ही गाड्या कणकवली रेल्वे स्थानकातून सुटणार आहेत. तारीख आणि वेळ लवकरच कळवण्यात येणार आहे. त्यामुळे आता कोकणवासियांना अयोध्येच्या राम मंदिराचे उद्घाटनादिवशी प्रत्यक्ष दर्शन घेता येणार आहे.

Comments
Add Comment

Coronation of Shivaji Maharaj : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे'

रायगड : दुर्गराज रायगडावर तिथीनुसार २७ जून २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला

Mantri Nitesh Rane : कोकणातील तीर्थस्थळे जलमार्गांनी जोडणार!

मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; आंगणेवाडी, कुणकेश्वर, गणपतीपुळे, पाली बल्लाळेश्वर मंदिराचा समावेश मुंबई :

Narendra Modi : सिंधुदुर्ग आणि नाशिक जागतिक पर्यटन स्थळे म्हणून विकसित करणार!

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडला रोडमॅप; २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार