सिकंदर शेखने पटकावली ‘महाराष्ट्र केसरी’ ची गदा

पुणे : महाराष्ट्र केसरी २०२३-२४च्या अंतिम सामन्याचा निकाल लागला असून वाशिमच्या सिकंदर शेख याला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळाला आहे. सिकंदर शेख याने गतविजेत्या शिवराज राक्षेला चीत करत बाजी मारली आहे.


२०२२-२३ च्या महाराष्ट्र केसरी विजेत्या शिवराज राक्षेला अवघ्या दहा सेकंदामध्ये आस्मान दाखवत सिकंदर शेख याने ६६वा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला आहे. पुण्यातील फुलगाव येथे यंदाची ६६वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाली. यावेळी सिकंदर शेखच्या विजयानंतर कुस्ती चाहत्यांनी एकच जल्लोष केल्याचे दिसून आले.


सेमी फायनलनमध्ये शिवराज राक्षे याने हर्षद कोकाटे याचा पराभव करत फायनल गाठली होती. तर माती विभागात सिकंदर शेखने संदीप मोटेचा सेमी फायनलमध्ये १०-० पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती. शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा उचलणार की सिकंदर यंदाचं महाराष्ट्र केसरीचं मैदान मारणार याकडे कुस्ती शौकिनांचं लक्ष लागलेले होते. पण, अखेर सिकंदरने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत बलाढ्य शरीरयष्टीच्या शिवराजला अवघ्या दहा सेकंदात चित करत आस्मान दाखवले.

Comments
Add Comment

'जल जीवन मिशन २.०’ साठी केंद्र आणि राज्य शासनात सामंजस्य करार

- मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या करारावर स्वाक्षऱ्या राज्यातील प्रत्येक ग्राम

पुण्यात पेट्रोल महागले, इराण-इस्रायल युद्धाचा पुणेकरांना फटका

पुणे: मध्यपूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याचा थेट परिणाम पुण्याच्या इंधन दरांवर झाला

अशोक खरात कारनाम्याचा भांडाफोड, १८ मार्च रोजी कसा झाला आरोपी?, जाणून घ्या

नाशिक: बड्या बेड्या नेत्यांचा 'गुरु' असलेल्या कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्याचा भांडाफोड सुरू झाला आहे. जवळपास ५८

सोसाट्याचा वाऱ्यासह गाराचा पाऊस पडणार, हवामान विभागाकडून पाच जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका सोसणाऱ्या महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने महत्त्वाची अपडेट दिली

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा