Health : वजन कमी करण्यासाठी कोमट पाणी, लिंबू घेताय तर जाणून घ्या पिण्याची योग्य वेळ

मुंबई: सध्याच्या मॉडर्न आणि धावपळीच्या आयुष्यात लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनली आहे. लठ्ठपणामुळे माणूस अनेक आजारांची शिकार होत आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी लोक नानाविध प्रयोग करत असतात. काहीजण एक्सरसाईज, योगा, जिम, डान्स क्लास, झुम्बा क्लास लावत असतात.


काहीजण तर घरात बसून अतिशय नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. यातीलच एक पद्धत म्हणजे कोमट पाण्यात लिंबूचा रस मिसळून पिणे. यामुळे वजन लवकर कमी होते असे म्हणतात.


मात्र अनेक लोकांची तक्रार असते की ते दररोज रिकाम्या पोटी लिंबू-कोमट पाण्याचे सेवन करतात मात्र त्यानंतरही त्यांचे वजन नियंत्रणात राहत नाही आहे. असे यासाठी कारण तुम्ही योग्य पद्धतीने लिंबू-पाणी पित नाही आहात. यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होत नाही आहे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते.



लिंबूपाणी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत


लिंबामधील व्हिटामिन सीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. वजन नियंत्रणात आणण्यासाठी हे यासाठी प्यायले जाते ज्यामुळे शरीरातील घाण बाहेर टाकली जावी. आरोग्य तज्ञांच्या मते दररोज रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्यास वजन नियंत्रणात राहते. हे आपले शरीर, त्वचा आणि केसांच्या विकासासाठी फायदेशीर आहे. कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी बाहेर निघण्यास मदत होते.


सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया मजबूत होण्यास मदत होते. शरीरातील फॅट बर्निंग प्रोसेस चांगली होते. जर तुम्ही दररोज सकाळी गरम पाण्यात लिंबू टाकून प्यायल्यास शरीर पूर्णपणे डिटॉक्स होण्यास मदत होते.

Comments
Add Comment

Mumbai Local Accident : शीव स्थानकाजवळ लोकलमधून ३ प्रवाशांचा तोल गेला अन् थेट रुळांवर फेकले गेले; २ जण गंभीर जखमी तर एक...

मुंबई : मुंबईच्या लोकल प्रवासातील जीवघेणी गर्दी पुन्हा एकदा प्रवाशांच्या मुळावर उठली आहे. शुक्रवारी सकाळी ऐन

राज्यात नवीन रक्तपेढी सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

रक्तपिशव्यांचे संकलन करण्यासाठी हमीपत्राची गरज मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यात नवीन रक्तपेढी सुरू

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरील वाहतूक बंद

मुंबई : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याची कामे

निवडणुका पुढे ढकलल्याने शिक्षक संभ्रमात

परीक्षा आणि निवडणूक ड्युटी एकाच वेळी; शिक्षकांच्या अडचणीत वाढ मुंबई : महाराष्ट्रात १२ जिल्हा परिषद आणि १२५

भाजपच्या नगरसेवकांची सोमवारी कोकण भवनमध्ये नोंदणी

गटाऐवजी भाजप स्वतंत्रपणे नगरसेवकांची करणार नोंदणी मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर

राज्यातील ‘आयटीआय’ होणार ‘स्किल डेव्हलमपेंट हब’

मंत्री मंगलप्रभात लोढा; पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे जिल्ह्याचा समावेश मुंबई : पंतप्रधान