मुंबई: सध्याच्या मॉडर्न आणि धावपळीच्या आयुष्यात लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनली आहे. लठ्ठपणामुळे माणूस अनेक आजारांची शिकार होत आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी लोक नानाविध प्रयोग करत असतात. काहीजण एक्सरसाईज, योगा, जिम, डान्स क्लास, झुम्बा क्लास लावत असतात.
काहीजण तर घरात बसून अतिशय नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. यातीलच एक पद्धत म्हणजे कोमट पाण्यात लिंबूचा रस मिसळून पिणे. यामुळे वजन लवकर कमी होते असे म्हणतात.
मात्र अनेक लोकांची तक्रार असते की ते दररोज रिकाम्या पोटी लिंबू-कोमट पाण्याचे सेवन करतात मात्र त्यानंतरही त्यांचे वजन नियंत्रणात राहत नाही आहे. असे यासाठी कारण तुम्ही योग्य पद्धतीने लिंबू-पाणी पित नाही आहात. यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होत नाही आहे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते.
लिंबामधील व्हिटामिन सीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. वजन नियंत्रणात आणण्यासाठी हे यासाठी प्यायले जाते ज्यामुळे शरीरातील घाण बाहेर टाकली जावी. आरोग्य तज्ञांच्या मते दररोज रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्यास वजन नियंत्रणात राहते. हे आपले शरीर, त्वचा आणि केसांच्या विकासासाठी फायदेशीर आहे. कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी बाहेर निघण्यास मदत होते.
सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया मजबूत होण्यास मदत होते. शरीरातील फॅट बर्निंग प्रोसेस चांगली होते. जर तुम्ही दररोज सकाळी गरम पाण्यात लिंबू टाकून प्यायल्यास शरीर पूर्णपणे डिटॉक्स होण्यास मदत होते.
मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…
महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…
वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…
मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाची राजधानी मॉस्को येथे पोहोचले आहेत. राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन…