Diwali Narakchaturdashi : दिवाळीत उटणं लावण्याची प्रथा का पडली? काय आहेत उटणं लावण्याचे फायदे?

  270

धनत्रयोदशीनंतरच्या (Dhanteras) दिवशी म्हणजे नरकचतुर्दशीला (Narakchaturdashi) दिवाळीतलं पहिलं अभ्यंगस्नान (Abhyangasnan) करण्याची प्रथा आहे. यामागची कथा अशी की, नरकासुर (Narakasur) नावाच्या राक्षसाने देशोदेशीच्या १६ हजार उपवर राजकन्यांना आपल्या बंदिवासात ठेवलं होतं. श्रीकृष्णाने अश्विन कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराचा वध केला आणि त्यांना मुक्त केलं. या सर्व स्त्रियांनी आपल्या सुटकेनंतर दिवे लावून आनंद व्यक्त केला. पुढे तीच प्रथा चालू राहिली.


मरताना नरकासुराने, आजच्या तिथीला जो अभ्यंगस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. तसंच माझा मृत्युदिन सर्वत्र दिवे लावून साजरा केला जावा, अशी श्रीकृष्णापाशी इच्छा व्यक्त केली होती. त्यावर कृष्णाने ही इच्छा पूर्ण होईल असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे पहाटे अभ्यंगस्नान या दिवशी करण्याची प्रथा पडली अशी कथा आहे. तसंच या दिवशी पायाखाली कारेटं फळ राक्षसाचं प्रतीक म्हणून चिरडलं जातं आणि नरकासुराचा वध केला जातो.



काय आहेत उटणं लावण्याचे फायदे?


दिवाळीचा सण म्हणजे थंडीला सुरुवात. या काळात त्वचेची काळजी घ्यावी लागते. उटणे त्वचेसाठी उपयुक्त आहे. तसेच ते आयुर्वेदिक (Ayurvedic) पद्धतीने घरच्या घरीही बनवता येऊ शकते. ही पद्धत जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख - घरच्याघरी आयुर्वेदिक उटणं? जाणून घ्या तयार करण्याची पद्धत...




  • कित्येक जणांना त्वचेवर मुरमं येतात आणि त्याचे डाग पडतात. काही जणांचा चेहरा प्रदुषणामुळे काळा पडतो. तर काहींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. या समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही उटण्याचा वापर करू शकता.

  • आपल्या शरीरावरील नको असलेले केस काढायचे असेल तरीही तुम्ही उटणे वापरू शकता. उटणे हा शरीरावरील केस काढून टाकण्यासाठी नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय आहे.

  • उटण्यामुळे चेहऱ्यावर तेज येते. उटण्यामधील नैसर्गिक औषधी गुणांमुळे त्वचा मुलायम व ताजीतवानी होते.

Comments
Add Comment

Crizac Limited IPO: उद्यापासून Crizac आयपीओ बाजारात दाखल होणार Price Band २३३ ते २४५ रूपये निश्चित!

प्रतिनिधी: उद्यापासून क्रिझॅक लिमिटेड (Crizac Limited) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होत आहे. ८६० कोटींचा

महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत