Diwali Abhyangasnan : घरच्याघरी आयुर्वेदिक उटणं? जाणून घ्या तयार करण्याची पद्धत...

  288

दिवाळीला (Diwali Festival) सुरुवात झाली असून सर्वत्र उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे. घरोघरी फराळाचा आस्वाद घेतला जातोय तर प्रत्येक घराबाहेर रांगोळ्या, कंदील सजले आहेत. दिवाळीमध्ये अभ्यंगस्नानाला (Diwali Abhyangasnan) विशेष महत्त्व आहे. नरकचतुर्दशीच्या (Narakchaturdashi) दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान केले जाते. पण केवळ दिवाळीच नव्हे तर रोजच उटण्याने आंघोळ करणे शरीरासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर असते, असे आयुर्वेद सांगते. परंतु, उटणं बाजारात विशेषतः दिवाळीच्या दिवसांतच विक्रीसाठी उपलब्ध होतं, अन्यथा त्याची उपलब्धता कमी असते. त्यामुळे आजच्या लेखात आपण हे उटणं घरीच कसं बनवायचं हे जाणून घेणार आहोत.



आयुर्वेदिक पध्दतीने उटणे कसे तयार करावे?


उटण्यामध्ये सहसा बेसनाचे पीठ, चंदन पावडर, दुध किंवा गुलाबजल वापरतात. उटण्यामध्ये बेसनाचे पीठ शरीरावरील मृत त्वचा (Dead Skin) काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरते. चंदन पावडरमध्ये कित्येक आयुर्वेदिक गुण आहेत. तिचा उटण्यामध्ये वापर केल्यास त्वचेवरील जास्तीचे तेल निघून जाते. उटण्यामध्ये दुधाचा वापर केल्यास त्वचेवरील काळे डाग दूर होतात आणि चमकही वाढते.


उटणे तयार करण्यासाठी मसूर डाळ पीठ आणि सुगंधी काचोरा प्रत्येकी १०० ग्रॅम घ्यावे. त्यात गुलाब चूर्ण, गुळवेल चूर्ण, जेष्ठमध चूर्ण, चंदन चूर्ण, हळद चूर्ण, कमळ चूर्ण प्रत्येकी ५० ग्रॅम मिसळावे. सर्व चुर्ण वस्त्रगाळ करुन घ्यावीत की झाले उटणे तयार. उटणे वापरण्यासाठी त्यात दूध किंवा तेल टाकून मिश्रण तयार करावे. उटणे अंगाला लावण्याआधी तेलाने मालिश करावी.

Comments
Add Comment

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या