३००, ४०० की ४५०, सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी पाकिस्तानला किती हव्यात धावा?

मुंबई: आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या(world cup 2023) सेमीफायनलमध्ये कोणता संघ खेळणार याचे चित्र मोठ्या प्रमाणात स्पष्ट झाले आहे. मात्र त्यावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. न्यूझीलंडच्या(new zealand) संघाने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत सेमीफायनलमधील आपले स्थान पक्के केले आहे. दरम्यान, पाकिस्तानसाठी मात्र सगळेच संपले आहे असे नाही. त्यांना जर स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर अशक्य ते शक्य करावे लागेल.


पाकिस्तान क्रिकेट संघाचा आयसीसीच्या विश्वचषकातील प्रवास संपल्यातच जमा आहे. मात्र पाकिस्तानी संघासाठी एक आशा अद्याप कायम आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या सामन्याआधी बाबर आझमच्या संघासाठी जे समीकरण होते ते पूर्ण पणे बदलले आहेत. सामन्याआधी श्रीलंकेच्या विजयासाठी अथवा पावसामुळे सामना रद्द होण्याची प्रार्थना केली जात होती. मात्र यापैकी काहीच घडले नाही. त्यामुळे आता जे समीकरण बनले आहे ते अशक्य वाटत आहे.



३००, ४०० की ४५०? कसा जिंकणार पाकिस्तान?


पाकिस्तानच्या संघाला सेमीफायनलमध्ये जिंकण्यासाठी सगळ्यात आधी टॉस जिंकावा लागेल आणि इंग्लंडने जिंकल्यास त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घ्यावा अशी प्रार्थना करावी लागेल. पाकिस्तानला पहिल्यांदा फलंदाजी करताना मोठा स्कोर उभा करावा लागेल आणि इंग्लंडला स्वस्तात बाद करावे लागेल. फक्त ३०० धावांनी त्यांचे काम होणार आहे. मात्र इतका स्कोर केल्यास इंग्लंडला १३ धावांवर ऑलआऊट करावे लागेल. पाकिस्तानने ४०० धावा केल्या तर इंग्लंडला ११२ धावांवर रोखावे लागेल. ४५० धावा केल्यास इंग्लंड संघाला १६२ धावांवर रोखावे लागेल.


सगळ्यात कमालीची बाब म्हणजे पाकिस्तानी संघाने आतापर्यंत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही ४००ची धावसंख्या उभारलेली नाही. अशातच त्यांना सेमीफायनलचे स्वप्न साकार करण्यासाठी सगळ्यात मोठा वनडे स्कोर उभा करावा लागेल.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत