३००, ४०० की ४५०, सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी पाकिस्तानला किती हव्यात धावा?

मुंबई: आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या(world cup 2023) सेमीफायनलमध्ये कोणता संघ खेळणार याचे चित्र मोठ्या प्रमाणात स्पष्ट झाले आहे. मात्र त्यावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. न्यूझीलंडच्या(new zealand) संघाने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत सेमीफायनलमधील आपले स्थान पक्के केले आहे. दरम्यान, पाकिस्तानसाठी मात्र सगळेच संपले आहे असे नाही. त्यांना जर स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर अशक्य ते शक्य करावे लागेल.


पाकिस्तान क्रिकेट संघाचा आयसीसीच्या विश्वचषकातील प्रवास संपल्यातच जमा आहे. मात्र पाकिस्तानी संघासाठी एक आशा अद्याप कायम आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या सामन्याआधी बाबर आझमच्या संघासाठी जे समीकरण होते ते पूर्ण पणे बदलले आहेत. सामन्याआधी श्रीलंकेच्या विजयासाठी अथवा पावसामुळे सामना रद्द होण्याची प्रार्थना केली जात होती. मात्र यापैकी काहीच घडले नाही. त्यामुळे आता जे समीकरण बनले आहे ते अशक्य वाटत आहे.



३००, ४०० की ४५०? कसा जिंकणार पाकिस्तान?


पाकिस्तानच्या संघाला सेमीफायनलमध्ये जिंकण्यासाठी सगळ्यात आधी टॉस जिंकावा लागेल आणि इंग्लंडने जिंकल्यास त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घ्यावा अशी प्रार्थना करावी लागेल. पाकिस्तानला पहिल्यांदा फलंदाजी करताना मोठा स्कोर उभा करावा लागेल आणि इंग्लंडला स्वस्तात बाद करावे लागेल. फक्त ३०० धावांनी त्यांचे काम होणार आहे. मात्र इतका स्कोर केल्यास इंग्लंडला १३ धावांवर ऑलआऊट करावे लागेल. पाकिस्तानने ४०० धावा केल्या तर इंग्लंडला ११२ धावांवर रोखावे लागेल. ४५० धावा केल्यास इंग्लंड संघाला १६२ धावांवर रोखावे लागेल.


सगळ्यात कमालीची बाब म्हणजे पाकिस्तानी संघाने आतापर्यंत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही ४००ची धावसंख्या उभारलेली नाही. अशातच त्यांना सेमीफायनलचे स्वप्न साकार करण्यासाठी सगळ्यात मोठा वनडे स्कोर उभा करावा लागेल.

Comments
Add Comment

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून