३००, ४०० की ४५०, सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी पाकिस्तानला किती हव्यात धावा?

मुंबई: आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या(world cup 2023) सेमीफायनलमध्ये कोणता संघ खेळणार याचे चित्र मोठ्या प्रमाणात स्पष्ट झाले आहे. मात्र त्यावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. न्यूझीलंडच्या(new zealand) संघाने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत सेमीफायनलमधील आपले स्थान पक्के केले आहे. दरम्यान, पाकिस्तानसाठी मात्र सगळेच संपले आहे असे नाही. त्यांना जर स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर अशक्य ते शक्य करावे लागेल.


पाकिस्तान क्रिकेट संघाचा आयसीसीच्या विश्वचषकातील प्रवास संपल्यातच जमा आहे. मात्र पाकिस्तानी संघासाठी एक आशा अद्याप कायम आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या सामन्याआधी बाबर आझमच्या संघासाठी जे समीकरण होते ते पूर्ण पणे बदलले आहेत. सामन्याआधी श्रीलंकेच्या विजयासाठी अथवा पावसामुळे सामना रद्द होण्याची प्रार्थना केली जात होती. मात्र यापैकी काहीच घडले नाही. त्यामुळे आता जे समीकरण बनले आहे ते अशक्य वाटत आहे.



३००, ४०० की ४५०? कसा जिंकणार पाकिस्तान?


पाकिस्तानच्या संघाला सेमीफायनलमध्ये जिंकण्यासाठी सगळ्यात आधी टॉस जिंकावा लागेल आणि इंग्लंडने जिंकल्यास त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घ्यावा अशी प्रार्थना करावी लागेल. पाकिस्तानला पहिल्यांदा फलंदाजी करताना मोठा स्कोर उभा करावा लागेल आणि इंग्लंडला स्वस्तात बाद करावे लागेल. फक्त ३०० धावांनी त्यांचे काम होणार आहे. मात्र इतका स्कोर केल्यास इंग्लंडला १३ धावांवर ऑलआऊट करावे लागेल. पाकिस्तानने ४०० धावा केल्या तर इंग्लंडला ११२ धावांवर रोखावे लागेल. ४५० धावा केल्यास इंग्लंड संघाला १६२ धावांवर रोखावे लागेल.


सगळ्यात कमालीची बाब म्हणजे पाकिस्तानी संघाने आतापर्यंत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही ४००ची धावसंख्या उभारलेली नाही. अशातच त्यांना सेमीफायनलचे स्वप्न साकार करण्यासाठी सगळ्यात मोठा वनडे स्कोर उभा करावा लागेल.

Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए