Quatar: कतारमध्ये ८ भारतीयांच्या मृत्यूच्या शिक्षेविरोधात भारताने दाखल केले अपील

Share

नवी दिल्ली: कतारमध्ये भारताच्या ८ माजी नौदल अधिकाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावल्याप्रकरणात भारत सरकार वेगवान कारवाई करत आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी दिलेल्या माहितीनुसार या संवेदनशील प्रकरणात भारताकडून अपील करण्यात आली आहे. तसेच भारतीय अधिकारी सातत्याने कतारमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जजमेंट गोपनीय आहे. अधिकृत टीमसोबतच याची चर्चा करण्यात आल आहे.सोबतच भारताने याप्रकरणी अपीलही केले. आम्ही कतारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत तसेच त्यांच्या कुटुंबियांच्याही संपर्कात आहेत. परराष्ट्र मंत्र्यांनीहीह त्यांची भेट घेतली होती. ७ नोव्हेंबरला काऊंसलर अॅक्सिस मिळाला आणि आम्ही त्या ८ भारतीयांशी भेटलो. हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे.

कतारच्या न्यायालयाने ज्या ८ भारतीयांना शिक्षा सुनावली आहे ते सर्व भारतीय नौदलाचे माजी अधिकारी आहेत. नौदलाचे हे ८ जवान गेल्या वर्षी ऑगस्ट २०२२ पासून कतारच्या जेलमध्ये बंद आहेत. दरम्यान, त्यांच्यावर लावलेल्या आरोपांबद्दल अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप सार्वजनिक कऱण्यात आलेले नाहीत. हे आधही अधिकारी खासगी कंपनी दहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीस अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेससाठी काम करत होते. कतारमध्ये भारताच्या राजदूतांनी यावर्षी एक ऑक्टोबरला जेलमध्ये यांची भेट घेतली होती.

कोण आहेत हे ८ भारतीय?

कॅप्टन नवतेज सिंह गिल, कॅप्टन सौरभ वाशिष्ठ, कमांडर पुरेनेंदु तिवारी, कॅप्टन बीरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि नाविक रागेश कतार जेलमध्ये कैद आहेत. यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Recent Posts

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

24 minutes ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

1 hour ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

1 hour ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

2 hours ago

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

8 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

8 hours ago