World Cup 2023: श्रीलंकेला हरवत पॉईंट्स टेबलमध्ये बांगलादेशने घेतली मोठी उडी

मुंबई: बांगलादेशने वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदा श्रीलंकेला हरवले. श्रीलंकेच्या संघाला ३ विकेटनी पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह शाकिब अल हसनच्या नेतृत्वातील बांगलादेश संघाने पॉईंट्स टेबलमध्ये उडी घेतली आहे. तर श्रीलंकेचा संघाला मात्र नुकसान सोसावे लागले.


आता बांगलादेशचा संघ पॉईंट्सटेबलवर सातव्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी सातव्या स्थानावर श्रीलंकेचा संघ होता. मात्र श्रीलंकेचा संघ आठव्या स्थानावर पोहोचला आहे. याआी श्रीलंकेचा संघ सातव्या स्थानावर होता. मात्र आता श्रीलंकेचा संघ खाली घसरला आहे.



बांगलादेश-श्रीलंकेचे गुण समान मात्र


बांगलादेश आणि श्रीलंकेचे ४-४ गुण आहेत. मात्र चांगल्या रनरेटमुळे बांगलादेशचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये श्रीलंकेच्या वर आहे. सोबतच या वर्ल्डकपमध्ये बांगलादेश आणि श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात आले आहे.



भारत आणि दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये


भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सेमीफायनलसाठी क्वालिफाय केले आहे. भारताचे ८ सामन्यात १६ पॉईंट्स आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने आपले सर्व सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेचे ८ सामन्यांत १२ पॉईंट आहेत. यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियाचे ७ सामन्यात १० पॉईंट्स आहेत. तर चौथ्या स्थानावर न्यूझीलंड आहे त्यांचे ८ सामन्यात ८ पॉईंट्स आहेत.



पाकिस्तान सेमीफायनलच्या शर्यतीत कुठे


बाबर आझमच्या नेतृत्वात खेळणाफ्या पाकिस्तान संघाचे ८ सामन्यात ८ गुण आहेत. तर अफगाणिस्तानचेही ८ सामन्यात ८ गुण आहेत मात्र चांगल्या रनरेटमुळे पाकिस्तान अफगाणिस्तानच्या पुढे आहे. याच पद्धतीने न्यूझीलंडशिवाय पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे ८-८ पॉईंट्स आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानने न्यूझीलंड आणि पाकिस्तानच्या तुलनेत एक सामना कमी खेळला आहे.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026: भारतीय संघाला मोठा झटका; 'हा' खेळाडू स्पर्धेतून बाहेर

मुंबई: आयसीसी पुरुष T२० विश्वचषक २०२६ ची आजपासून (शनिवार, ७ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि