World Cup 2023: श्रीलंकेला हरवत पॉईंट्स टेबलमध्ये बांगलादेशने घेतली मोठी उडी

मुंबई: बांगलादेशने वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदा श्रीलंकेला हरवले. श्रीलंकेच्या संघाला ३ विकेटनी पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह शाकिब अल हसनच्या नेतृत्वातील बांगलादेश संघाने पॉईंट्स टेबलमध्ये उडी घेतली आहे. तर श्रीलंकेचा संघाला मात्र नुकसान सोसावे लागले.


आता बांगलादेशचा संघ पॉईंट्सटेबलवर सातव्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी सातव्या स्थानावर श्रीलंकेचा संघ होता. मात्र श्रीलंकेचा संघ आठव्या स्थानावर पोहोचला आहे. याआी श्रीलंकेचा संघ सातव्या स्थानावर होता. मात्र आता श्रीलंकेचा संघ खाली घसरला आहे.



बांगलादेश-श्रीलंकेचे गुण समान मात्र


बांगलादेश आणि श्रीलंकेचे ४-४ गुण आहेत. मात्र चांगल्या रनरेटमुळे बांगलादेशचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये श्रीलंकेच्या वर आहे. सोबतच या वर्ल्डकपमध्ये बांगलादेश आणि श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात आले आहे.



भारत आणि दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये


भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सेमीफायनलसाठी क्वालिफाय केले आहे. भारताचे ८ सामन्यात १६ पॉईंट्स आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने आपले सर्व सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेचे ८ सामन्यांत १२ पॉईंट आहेत. यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियाचे ७ सामन्यात १० पॉईंट्स आहेत. तर चौथ्या स्थानावर न्यूझीलंड आहे त्यांचे ८ सामन्यात ८ पॉईंट्स आहेत.



पाकिस्तान सेमीफायनलच्या शर्यतीत कुठे


बाबर आझमच्या नेतृत्वात खेळणाफ्या पाकिस्तान संघाचे ८ सामन्यात ८ गुण आहेत. तर अफगाणिस्तानचेही ८ सामन्यात ८ गुण आहेत मात्र चांगल्या रनरेटमुळे पाकिस्तान अफगाणिस्तानच्या पुढे आहे. याच पद्धतीने न्यूझीलंडशिवाय पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे ८-८ पॉईंट्स आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानने न्यूझीलंड आणि पाकिस्तानच्या तुलनेत एक सामना कमी खेळला आहे.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे