Sada Sarvankar : सिद्धिविनायक मंदिर न्यास हे कोणत्याही गटाकडे नव्हतं, ही जबाबदारी...

सिद्धीविनायकाच्या अध्यक्षपदी निवड झालेले सदा सरवणकर काय म्हणाले?


मुंबई : सिद्धिविनायक मंदिर न्यास (Siddhivinayak Temple Trust) अध्यक्षपदी शिवसेना (Shivsena) माहिम दादर विधानसभेचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांची आज नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) या समितीचे अध्यक्ष होते. मात्र, आज शिवसेनेच्या सदा सरवणकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती केल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. याबाबत सदा सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


“मी स्वतःला भाग्यवान समजतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी माझ्यावर विश्वास टाकून सिद्धिविनायकसारख्या पवित्र संस्थेची जबाबदारी सोपवली. गेली अनेक वर्षे मंदिर परिसरात अनेक गणेश भक्तांच्या अडचणी मी पाहिल्या आहेत. त्यामुळे आता मला गणेश भक्तांसाठी बरंच काम करता येईल” , असं सदा सरवणकर म्हणाले.


“सिद्धिविनायक मंदिर न्यास हे कोणत्याही गटाकडे नव्हतं. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आणि गेल्या अनेक वर्षे काम करणाऱ्या शिवसेनेकडे होतं. त्याच विचाराने पूर्वी असलेल्या शिवसेनेकडे ही जबाबदारी आली आहे. ही मोठी जबाबदारी आहे. शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्त्वाचे विचार, गणेशभक्तांच्या भावना पूर्ण करण्याची संधी आणि गटातटाचा विचार न करता भाविकांना जास्तीत जास्त कशा सुविधा उपलब्ध करून देता येतील याचा प्रयत्न केला जाईल”, असंही ते म्हणाले.

Comments
Add Comment

Cyprus and India : सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस 'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त मुंबई :

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच