गावातल्या तरुणीशी प्रेमसंबंध जीवावर बेतले!

Share

गर्लफ्रेंडचे लग्न ठरल्याने तरुणाला स्फोटकांनी उडवले

उदयपूर : राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातील ऋषभदेव पोलीस ठाणे हद्दीतल्या गावात एक धक्कादायक घटना घडली असून प्रेमासाठी बळी गेलेल्या त्या प्रेमवीराने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली, याबाबत मोठा पेच निर्माण झाला आहे.

प्रेयसीचा विवाह दुसऱ्या तरुणाशी ठरल्याच्या वैफल्यग्रस्तेतून त्याने स्वत:ला शरीराला चक्क स्फोटके (Detonator) बांधून उडवून दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. नीलेश मीणा (२४) असे या तरुणाचे नाव आहे. रविवारी (५ नोव्हेंबर) रात्री उशीरा ही घटना घडली.

तर तरुणाच्या कुटुंबीयांनी तरुणीच्या कुटुंबीयांविरोधात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३०२ (हत्या) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास सुरु केला आहे.

येथील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नीलेश मीणा (मृत) याचे गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्याला तिच्यासोबत विवाह करण्याची तीव्र इच्छा होती. मात्र, दोघांचेही गोत्र एकच असल्याने कुटुंबीयांनी या लग्नाला विरोध केला. परिणामी तिचा विवाह दुसऱ्या ठिकाणी ठरवला. या घटनेमुळे प्रचंड निराश झालेल्या या तरुणाने स्वत:ला स्फोटकांनी उडवून दिले.

प्राथमिक माहितीमध्ये पुढे आले आहे की, नीलेश याने रविवारी दुपारीच कोठून तरी डेटोनेटर आणले होते. त्यानंतर त्याने रात्र होण्याची वाट पाहीली. त्यानंतर रात्रीच्या अंधारात तो घरापासून १०० मीटर अंतरावर दूर गेला. तिथे त्याने आपल्या शरीराला डेटोनेटर लावून स्वत:ला उडवून दिले. स्फोटकांचा आवाज ऐकून कुटुंबीय आणि परिसरातील लोक घटनास्थळी आले असता तरुणाचे शीर धडावेगळे झाल्याचे पाहायला मिळाले.

सदर घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला आहे. त्यांनी तरुणीच्या कुटुंबावर हत्येचा आरोप केला आहे. त्यांनी आरोप केला आहे की, तरुणीच्या कुटुंबीयांनीच त्याचे शीर धडावेगळे केले. नीलेश हा शेतकरी कुटुंबातून येतो. त्याचे घर शेतीवर आणि मोलमजुरीवर चालते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, त्याच्या शरीराचे तुकडे झाले होते. त्याचे डोकेही धडासोबत राहिले नव्हते. नीलेशच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ आणि एक बहीण आहे.

पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीत नीलेशचे वडील राजमल मीणा यांनी आरोप केला आहे की, रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास काही लोक माझ्या मुलाला घरातुन बोलवून घेऊन गेले होते. त्यांनीच माझ्या मुलाचा गळा कापला आहे. मात्र कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी स्फोटके उडवून प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पोलीस योग्य तपास करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Recent Posts

रेणुका माता छात्रावास, चिपळूण

सेवाव्रती: शिबानी जोशी ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे…

1 hour ago

मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ

मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…

4 hours ago

रोहित शर्माने टी-२०मधून निवृत्ती घेतल्यानंतर बदलला प्रोफाईल फोटो, मिलियनहून अधिक लाईक्स

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…

5 hours ago

देशात ११३ वैद्यकीय कॉलेज सुरु करण्यास मान्यता

महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…

6 hours ago

अमेरिकेत आर्थिक मंदीची लाट; सुमारे एक लाख भारतीयांच्या नोकऱ्या जाण्याची भीती

वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…

6 hours ago

Hair Fall: केसगळती रोखायची असेल तर जरूर खा हे पदार्थ, हेअरफॉल होईल कमी

मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…

6 hours ago