IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया करत होती सेमीफायनल आणि फायनलची तयारी, जडेजाचा खुलासा

कोलकाता: २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकातील लीग स्टेजमधील आतापर्यंतचे सर्व ८ सामने एकतर्फी जिंकल्याने भारतीय संघाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा प्रचंड उत्साहित आहे. रविवारी विजयानंतर जडेजाने सांगितले की दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया नॉकआऊटची तयारी करत होती. सोबतच त्यांनी नॉकआऊट स्टेजआधी अशा प्रकारच्या कामगिरीने टीम इंडियाविरुद्धचे संघ भारताच्या दबावाखाली राहतील.


गेल्या सामन्यात श्रीलंकेला ३०२ धावांनी हरवल्यानंतर भाताने ईडन गार्डनवर आफ्रिकेचा २४३ धावांनी पराभव केला. आता टीम इंडिया आपला शेवटचा सामना १२ नोव्हेंबरला नेदरलँड्विरुद्ध खेळणार आहे.



पाहा काय म्हणाला जडेजा पत्रकार परिषदेत


रवींद्र जडेजा सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाला, ही चांगली बाब आहे की आम्ही सगळे सामने एकतर्फी जिंकले. कारण यामुळे समोरच्या संघावर दबाव राहतो. त्यांच्या कामगिरीवरही परिणाम होतो.


आम्ही प्रत्येक सामन्यागणिक रणनीती बनवतो. नॉकआऊट टप्पा महत्त्वाचा आहे. मात्र संघ प्रत्येक विभागात चांगला खेळ करत आहे आणि हीच लय आम्ही सेमीफायनल आणि फायनलमध्येही कायम राखू.


जडेजाने या पिचव ३००हून अधिक धावसंख्या बनवण्याचे श्रेय विराट कोहली आणि मध्यम फळीतील फलंदाजांना दिले. आफ्रिकेच्या गोलंदाजीदरम्यान विकेटमध्ये टर्न होता. मात्र येथे फलंदाजीसाठी सोपे झाले. विराट आणि मधल्या फळीतील फलंदाजांना याचे श्रेय जाते की त्यांनी मंद आणि कमी उसळणाऱ्या विकेटवर चांगली फलंदाजी केली. आम्ही मानसिकरित्या ययासाठी तयार होतो.


कोहलीच्या बर्थडेमुळे संघाला अतिरिक्त प्रेरणा मिळाली होती का? यावर उत्तर देताना जडेजा म्हणाला, भारताची जर्सी घालून खेळणे म्हणजे बर्थडे असल्यासारखेच. कारण खूप कमी लोकांना ही संधी मिळते. बर्थडेच्या दिवशी जर कोणी संघाला जिंकून दिले तर यापेक्षा चांगले काय असू शकते.

Comments
Add Comment

ICC T20 World Cup 2026 : भारत-पाक मॅच होणार? ICCने एका झटक्यात विषय संपवला अन्...

दुबई : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ (ICC T20 World Cup 2026) मधील सर्वात बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना अवघ्या सहा दिवसांवर

IND vs PAK : आयसीसीचा पाकिस्तानला थेट इशारा; पाकिस्तान माघार घेणार?

लाहोर: रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी पुढच्या अंडर १९ विश्वचषकाला मुकणार; आयसीसीकडून वैभवचा मोठा सन्मान

अंडर १९ विश्व चषक २०२६ भारतीय संघाने जिंकला. या चषकात १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने शानदार कामगिरी केली. आपल्या

श्रीलंकेच्या फिरकीपुढे आयर्लंडची शरणागती

२० धावांनी थरारक विजय मिळवत यजमान संघ सरस कोलंबो : टी-२० विश्वचषक २०२६ च्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात यजमान

नवख्या वाटणाऱ्या संघांनी अनुभवी संघांना रडवले

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक ७ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत पाच सामने

टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये शाकिब अव्वलस्थानी

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक ७ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. स्पर्धा सुरू होताच विश्वचषकात