Nitesh Rane Sindhudurga : सिंधुदुर्गात नितेश राणे यांचीच जादू कायम; ओटव ग्रामपंचायत भाजपकडे

जाणून घ्या दुपारी बारा वाजेपर्यंत कोणाच्या खात्यात किती जागा...


सिंधुदुर्ग : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Grampanchayat Elections) काल रविवारी पार पडल्या. राज्यभरातल्या २ हजार ३६९ ग्रामपंचायतींची आज मतमोजणी होत आहे. आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने यावेळी जनतेचा कौल कोणाकडे आहे? हे या निवडणुकींतून आजमावता येणार आहे. यातील काही निवडणुकांचे निकाल हाती आले असून पुन्हा एकदा महायुतीचीच सत्ता येणार, हे स्पष्ट झाले आहे. महायुतीत सामील असणार्‍या पक्षांनी आतापर्यंत सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.

सिंधुदुर्गात (Sindhudurga) तळकोकणात भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांची जादू कायम आहे. कणकवलीतील ओटव ग्रामपंचायत भाजपकडे आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण राणे कुटुंबियांचं सिंधुदुर्ग भागात मोठं वर्चस्व आहे. कोकणसाठी अनेक विकासकामं राणे कुटुंबियांनी केली आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही त्यांचाच दबदबा कायम राहिला आहे.


दरम्यान, आतापर्यंतच्या निकालानुसार भाजपनेच सगळ्यांत जास्त जागा जिंकल्या आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार,
भाजप – १५१ जागा
अजित पवार गट – १२६ जागा
शिवसेना – ९८ जागा
काँग्रेस – ६८ जागा
ठाकरे गट – ६० जागा
शरद पवार गट – ५६ जागा
इतर – ८८ जागा
आतापर्यंत एकूण ३७५ जागा मिळवत महायुतीची यशस्वी घोडदौड सुरु आहे. तर मविआला १८४ व इतर पक्षांना ८८ जागा जिंकता आल्या आहेत.

Comments
Add Comment

Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक