Grampanchayat Elections : ग्रामपंचायतीच्या निवडणुकींमध्ये महायुतीचाच धुरळा

ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का


मुंबई : राज्यातील महापालिकेच्या निवडणुकांची वाट पाहावी लागत असली तरी ग्रामपंचायतींच्या निवडणुका काल रविवारी पार पडल्या. राज्यभरातल्या २ हजार ३६९ ग्रामपंचायतींची आज मतमोजणी होत आहे. आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने यावेळी जनतेचा कौल कोणाकडे आहे? हे या निवडणुकांतून आजमावता येणार आहे. त्यामुळे या निवडणुकांना विशेष महत्त्व आहे. यातील काही निवडणुकांचे निकाल हाती आले असून पुन्हा एकदा महायुतीचीच सत्ता येणार, हे स्पष्ट झाले आहे. महायुतीत सामील असणार्‍या पक्षांनी आतापर्यंत सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.


आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार,
भाजप - ८१ जागा
अजित पवार गट - ७७ जागा
शिवसेना - ६५ जागा
काँग्रेस - ३६ जागा
ठाकरे गट - ३० जागा
शरद पवार गट - ३१ जागा
इतर - ४२ जागा
त्यामुळे भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्याचे दिसून येत आहे. राज्यभरात जरी महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवणार असली, तरी ग्रामपंचायत किंवा सथानिक पातळीवर प्रत्येक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढताना दिसतो. त्यामुळे सध्या भाजपचेच वर्चसव असल्याचे समजत आहे. महायुतीने आतापर्यंत २२३, मविआने ९७ तर इतर गटांनी ४२ जागांवर वर्चस्व मिळवले आहे.

Comments
Add Comment

Latur : लातूरसाठी ‘देवाभाऊ’ आरोग्यदूत, १०० खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन

लातूर : लातूर जिल्ह्याच्या आरोग्य संवर्धनासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या १०० खाटांच्या अत्याधुनिक जिल्हा

Chitra Wagh : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना उद्ध्वस्त करणार, चित्रा वाघ कडाडल्या

नाशिक : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही. तपास पथक आरोपींविरोधात

Fighter Jet Emergency Landing Pune : पुण्यात लढाऊ विमानाचे अचानक लँडिंग; करावे लागले चक्क विमानतळ बंद; नेमकं काय घडलं त्या रात्री?

पुणे : विमानाचा अपघात आता रस्ते अपघातासारखा सर्वसाधारण झालाय. काल पुण्याच्या धावपट्टीवर रात्री एक लढाऊ विमानाचे

Thane : मेट्रो, टनेल, पॉड टॅक्सी ते परवडणारी घरे; ठाणे बनतंय सुपर सिटी

ठाणे : “पूर्वी ‘पुणे तिथे काय उणे’ म्हटले जायचे; आता ‘ठाणे तिथे काय उणे’ असे आत्मविश्वासाने म्हणण्याची वेळ आली

Jitendra Shelke Death : अशोक खरात यांचे निकटवर्तीयाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू, पत्नी आणि मुलगा गंभीर

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, शुक्रवारी झालेल्या एका भीषण अपघातात

Heat wave : १३ राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा, काळजी घेण्याचे आवाहन

- अकोला देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक उष्ण शहर मुंबई : सध्या देशभरातील हवामानात मोठे बदल होत आहेत. काही