Grampanchayat Elections : ग्रामपंचायतीच्या निवडणुकींमध्ये महायुतीचाच धुरळा

ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का


मुंबई : राज्यातील महापालिकेच्या निवडणुकांची वाट पाहावी लागत असली तरी ग्रामपंचायतींच्या निवडणुका काल रविवारी पार पडल्या. राज्यभरातल्या २ हजार ३६९ ग्रामपंचायतींची आज मतमोजणी होत आहे. आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने यावेळी जनतेचा कौल कोणाकडे आहे? हे या निवडणुकांतून आजमावता येणार आहे. त्यामुळे या निवडणुकांना विशेष महत्त्व आहे. यातील काही निवडणुकांचे निकाल हाती आले असून पुन्हा एकदा महायुतीचीच सत्ता येणार, हे स्पष्ट झाले आहे. महायुतीत सामील असणार्‍या पक्षांनी आतापर्यंत सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.


आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार,
भाजप - ८१ जागा
अजित पवार गट - ७७ जागा
शिवसेना - ६५ जागा
काँग्रेस - ३६ जागा
ठाकरे गट - ३० जागा
शरद पवार गट - ३१ जागा
इतर - ४२ जागा
त्यामुळे भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्याचे दिसून येत आहे. राज्यभरात जरी महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवणार असली, तरी ग्रामपंचायत किंवा सथानिक पातळीवर प्रत्येक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढताना दिसतो. त्यामुळे सध्या भाजपचेच वर्चसव असल्याचे समजत आहे. महायुतीने आतापर्यंत २२३, मविआने ९७ तर इतर गटांनी ४२ जागांवर वर्चस्व मिळवले आहे.

Comments
Add Comment

Snake Venom Bank : राज्यात 'सर्पविष बँक' स्थापन होणार - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- सर्पदंशाला 'नोटिफाईड डिसिज' घोषित करण्याबाबत सकारात्मक मुंबई : राज्यात सर्पदंश आणि त्यामुळे होणाऱ्या

Maharashtra Weather : महाराष्ट्रात ६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यावर रेड-ऑरेंज अलर्ट

मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार ३० जून ते ६ जुलैदरम्यान महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची

IVF center : विनापरवानगी 'आयव्हीएफ सेंटर' चालवणाऱ्यांवर मकोका लावणार

- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर; पुढील अधिवेशनात कायद्यात सुधारणा करण्याची ग्वाही मुंबई : राज्यात वाढत असलेली

Jalgaon : जळगाव स्थानकावर मोठा अनर्थ टळला! धावत्या अमृतसर एक्स्प्रेसच्या जनरेटर बोगीला आग

Jalgaon Railway Station : जळगाव रेल्वे स्थानकावर बुधवारी सकाळी एक मोठा अनर्थ थोडक्यात टळला. मुंबईहून अमृतसरकडे धावणाऱ्या

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या

Thailand Job Scam : राज्यातील २५ तरुण थायलंड-म्यानमार सीमेवर अडकले

- सुटकेसाठी राज्य सरकार सक्रिय; मुख्यमंत्र्यांकडून गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी मुंबई : फेसबुकवरील आकर्षक