Bharat Atta: सणासुदीच्या दिवसांत महागाईपासून दिलासा, २७.५० रूपये प्रति किलो सरकार विकणार भारत ब्रँड पीठ

नवी दिल्ली: गव्हाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्यानंतर पिठाच्या वाढलेल्या किंमती पाहून सरकारने सामान्य लोकांसाठी स्वस्त दरात पीठ उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. याच दिशेने सरकारने एक पाऊल टाकले. सरकारने स्वस्त दरात पीठ विकण्याचा निर्णय घेतला आहे. २७.५० रूपये प्रति किलो दराने भारत आटा सरकार ग्राहकांना विकणार आहे.



सरकार विकणार स्वस्त दरात पीठ


भारत ब्रँड नावाने पीठ विकण्यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी १०० मोबाईल व्हॅनला राजधानीच्या कर्तव्य पथावर हिरवा झेंडा दाखवत रवाना केले. भारत पीठ २७.५० रूपयांत विकले जाईल. या मोबाईल व्हॅनशिवाय भारत आटा केंद्रीय भंडारावरही उपलब्ध असेल. सोबतच सरकारच्या एजन्सी नेफेड आणि एसीसीएफमध्येही स्वस्त दरात पीठ उपलब्ध केले जाणार आहे.



२७.५० रूपये किलोने पीठ उपलब्ध


गव्हाच्या वाढत्या किंमती पाहता सरकारने २.५ लाख टन गहू २१.५० रूपये किलोच्या भावाने केंद्रीय भंडार, एनसीसीएफ आणि नाफेडसारख्या एजन्सीना ओपन मार्केट सेल स्कीम अंतर्गत उपलब्ध केले आहे. यात भारत आटा ब्रँड २७.५० रूपये किलो दराने ग्राहकांना स्वस्त दरात उपलब्ध करून दिला जाणार आहे.



वाढत्या किंमतीवर नियंत्रण


केंद्रीय मंत्री पियुष गोएल म्हणाले की सरकारने वेळीच दखल घेतल्याने अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. याआधी सरकारने टोमॅटो आणि कांद्याच्या किंमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. सरकार आधीपासूनच ६० रूपये प्रति किलो दराने भारत डाळ ग्राहकांना विकत आहे.

Comments
Add Comment

Loud DJ music kills 140 chickens : उत्तर प्रदेशमध्ये डीजेच्या भयानक आवाजाने १४० कोंबड्यांचा मृत्यू; DJ चालकावर FIR दाखल

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सुलतानपूर (Sultanpur) जिल्ह्यातून एक अतिशय विचित्र आणि तितकीच धक्कादायक घटना

अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ दुर्मिळ वस्तू, वस्तूची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

America returns 657 rare items to India : भारतातून अनेक प्राचीन वस्तू, मूर्ती यांची त्यांच्या दुर्मिळतेमुळे परदेशांमध्ये तस्करी (smuggling)

1 may labour day : १ मे रोजी बँका सुरू राहणार की बंद ? नवीन माहिती पहा

मुंबई : उद्या, १ मे रोजी बँकांना सुट्टी असणार का? १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या कामगार चळवळीची आठवण

Crime Jharkhand : आधी प्रियकरावर पैसा उडवला नंतर प्रियकराच्या प्रेमात भयानक करून बसली, थेट आईलाच...

Jharkhand Crime : झारखंडची राजधानी रांचीमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका ५० वर्षाच्या महिलेची हत्या

Raja Raghuvanshi Case: 11 महिन्यांनतर सोनम जेलमधून बाहेर, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित

शिलॉन्ग  Shillong : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली होती. याच राजा रघुवंशी हत्या प्रकरणात

भीषण ! एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग , अल्पवयीन मुलीसह 5 जणांचा करून अंत

दिल्ली : दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण दुर्घटना झाली आहे. मुलाची नोकरी मिळवण्याची इच्छा पूर्ण