Bharat Atta: सणासुदीच्या दिवसांत महागाईपासून दिलासा, २७.५० रूपये प्रति किलो सरकार विकणार भारत ब्रँड पीठ

नवी दिल्ली: गव्हाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्यानंतर पिठाच्या वाढलेल्या किंमती पाहून सरकारने सामान्य लोकांसाठी स्वस्त दरात पीठ उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. याच दिशेने सरकारने एक पाऊल टाकले. सरकारने स्वस्त दरात पीठ विकण्याचा निर्णय घेतला आहे. २७.५० रूपये प्रति किलो दराने भारत आटा सरकार ग्राहकांना विकणार आहे.



सरकार विकणार स्वस्त दरात पीठ


भारत ब्रँड नावाने पीठ विकण्यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी १०० मोबाईल व्हॅनला राजधानीच्या कर्तव्य पथावर हिरवा झेंडा दाखवत रवाना केले. भारत पीठ २७.५० रूपयांत विकले जाईल. या मोबाईल व्हॅनशिवाय भारत आटा केंद्रीय भंडारावरही उपलब्ध असेल. सोबतच सरकारच्या एजन्सी नेफेड आणि एसीसीएफमध्येही स्वस्त दरात पीठ उपलब्ध केले जाणार आहे.



२७.५० रूपये किलोने पीठ उपलब्ध


गव्हाच्या वाढत्या किंमती पाहता सरकारने २.५ लाख टन गहू २१.५० रूपये किलोच्या भावाने केंद्रीय भंडार, एनसीसीएफ आणि नाफेडसारख्या एजन्सीना ओपन मार्केट सेल स्कीम अंतर्गत उपलब्ध केले आहे. यात भारत आटा ब्रँड २७.५० रूपये किलो दराने ग्राहकांना स्वस्त दरात उपलब्ध करून दिला जाणार आहे.



वाढत्या किंमतीवर नियंत्रण


केंद्रीय मंत्री पियुष गोएल म्हणाले की सरकारने वेळीच दखल घेतल्याने अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. याआधी सरकारने टोमॅटो आणि कांद्याच्या किंमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. सरकार आधीपासूनच ६० रूपये प्रति किलो दराने भारत डाळ ग्राहकांना विकत आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, तपास यंत्रणा सतर्क

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना जीवे

Gujarat ATS : गुजरात एटीएसकडून जैश-ए-मोहम्मदच्या संशयित मॉड्यूलचा पर्दाफाश , ८ आरोपी अटकेत

अहमदाबाद : गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अनेक राज्यांमध्ये संयुक्त कारवाई करत, बंदी घातलेल्या

Waterfall Trip : धबधब्याखाली भिजायचंय? मग हे 5 वॉटरप्रूफ गॅझेट्स नक्की सोबत ठेवा

वॉटरफॉल ट्रिपची तयारी झाली? धबधब्याखाली (Waterfall) मनसोक्त भिजण्याचा आनंद घ्या, पण तुमचा फोन, गॅझेट्स (Gadgets) आणि

Totapuri mango : तोतापुरी आंबा क्षेत्राच्या सर्वसमावेशक मूल्यांकनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश

नवी दिल्ली : आंध्रप्रदेशातील तोतापुरी आंबा उत्पादकांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे परीक्षण करण्यासाठी आणि या

PM Internship Scheme : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना तिसऱ्या टप्प्यात तरुणांसाठी मोठी संधी

पुणे : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून

Anti Terror Operation : जैशच्या ८ संशयित दहशतवाद्यांना अटक

गुजरात : देशाची सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, गुजरात एटीएस (Gujarat ATS) आणि दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) केलेल्या