Bharat Atta: सणासुदीच्या दिवसांत महागाईपासून दिलासा, २७.५० रूपये प्रति किलो सरकार विकणार भारत ब्रँड पीठ

नवी दिल्ली: गव्हाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्यानंतर पिठाच्या वाढलेल्या किंमती पाहून सरकारने सामान्य लोकांसाठी स्वस्त दरात पीठ उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. याच दिशेने सरकारने एक पाऊल टाकले. सरकारने स्वस्त दरात पीठ विकण्याचा निर्णय घेतला आहे. २७.५० रूपये प्रति किलो दराने भारत आटा सरकार ग्राहकांना विकणार आहे.



सरकार विकणार स्वस्त दरात पीठ


भारत ब्रँड नावाने पीठ विकण्यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी १०० मोबाईल व्हॅनला राजधानीच्या कर्तव्य पथावर हिरवा झेंडा दाखवत रवाना केले. भारत पीठ २७.५० रूपयांत विकले जाईल. या मोबाईल व्हॅनशिवाय भारत आटा केंद्रीय भंडारावरही उपलब्ध असेल. सोबतच सरकारच्या एजन्सी नेफेड आणि एसीसीएफमध्येही स्वस्त दरात पीठ उपलब्ध केले जाणार आहे.



२७.५० रूपये किलोने पीठ उपलब्ध


गव्हाच्या वाढत्या किंमती पाहता सरकारने २.५ लाख टन गहू २१.५० रूपये किलोच्या भावाने केंद्रीय भंडार, एनसीसीएफ आणि नाफेडसारख्या एजन्सीना ओपन मार्केट सेल स्कीम अंतर्गत उपलब्ध केले आहे. यात भारत आटा ब्रँड २७.५० रूपये किलो दराने ग्राहकांना स्वस्त दरात उपलब्ध करून दिला जाणार आहे.



वाढत्या किंमतीवर नियंत्रण


केंद्रीय मंत्री पियुष गोएल म्हणाले की सरकारने वेळीच दखल घेतल्याने अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. याआधी सरकारने टोमॅटो आणि कांद्याच्या किंमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. सरकार आधीपासूनच ६० रूपये प्रति किलो दराने भारत डाळ ग्राहकांना विकत आहे.

Comments
Add Comment

Melody Trend and Parle Shares : 'Melodi' ट्रेंडची कमाल; क्षणार्धात वाढले पार्लेचे शेअर्स; पण फायदा मात्र दुसऱ्याच कंपनीचा झाला; जाणून घ्या नेमकं काय घडलं

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर नरेंद्र मोदी यांनी

DRDO : आता यूएवीमधून डागता येणार निर्देशित क्षेपणास्त्र; डीआरडीओच्या चाचण्या पूर्ण

- आंध्र प्रदेशातील कुरनूलजवळील डीआरडीओ चाचणी क्षेत्रात ही कामगिरी साध्य नवी दिल्ली : भारत आता मानवरहित हवाई

Shocking : खेळता-खेळता गाडीत अडकली, दोन तास ऑक्सिजनसाठी धडपडली अन् गुदमरून ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

मध्य प्रदेश : आपले घर आणि घराचे अंगण हे मुलांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण असते, असा प्रत्येक पालकाचा ठाम विश्वास

Iran America War : मोबाईलमधील इंटरनेट आणि UPI सेवा ठप्प होणार ? इराणच्या खळबळजनक वक्तव्याने उडाली तारांबळ!

आजच्या काळात श्वास घेण्याइतकेच इंटरनेट (Internet) गरजेचे झाले आहे. सकाळच्या अलार्मपासून ते रात्रीच्या सोशल मीडिया (Social

Stray Dogs : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : शाळा आणि रुग्णालयांंजवळून भटके कुत्रे हटवण्याचे आदेश कायम

नवी दिल्ली : देशात भटक्या कुत्र्यांचा वाढता प्रादुर्भाव (Stray Dogs) आणि त्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटना लक्षात

Uttarakhand Train Accident : ऋषिकेशमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला! उज्जयनी एक्सप्रेसचे ३ डब्बे रुळावरून घसरले

ऋषिकेश : उत्तराखंडमधील ऋषिकेश (Uttarakhand Train Accident) येथे उज्जयनी एक्सप्रेसशी संबंधित धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेशन