दिल्ली-NCRमध्ये प्रदूषणाची स्थिती गंभीर, GRAP-4 लागू, या कामांवर बंदी

नवी दिल्ली: नवी दिल्लीमध्ये प्रदूषणाची(pollution) स्थिती दिवसेंदिवस अतिशय गंभीर होत चालली आहे. तेथील स्थिती पाहता हवेच्या गुणवत्ता प्रबंधन आयोगाने राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ग्रॅप (Graded Response Action Plan) चा चौथा टप्पा लागू केला आहे. सीएक्यूएम उप समितीने वायू गुणवत्तामध्ये आणखी घसरण रोखण्यासाठी टप्पा १, २ आणि ३ अंतर्गत सर्व कारवायांशिवाय तत्कालीन प्रभावाने पूर्ण एनसीआरमध्ये जीआरएपीचा टप्पा ४नुसार ८ सूत्रीय कार्य योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.


इलेक्ट्रिकल व्हेईकल, सीएनजी, बीएस ६ डिझेलशिवाय दिल्लीच्या बाहेर पंजीकृत छोट्या गाड्यांना राष्ट्रीय राजधानीमध्ये प्रवेशास अनुमती असणार नाही. आवश्यक वस्तू तसेच सेवा देणाऱ्या गाड्यांना यात सूट असेल.


दिल्लीमध्ये पंजीकृत मध्यम आणि भारी डिझेल माल वाहनांच्या संचलनावर बंदी असेल. आवश्यक वस्तू तसेच सेवा प्रदान करणाऱ्या वाहनांना सूट असेल.


राजमार्ग, रस्के, फ्लायओव्हर, ओव्हरब्रिज, पॉवर ट्रान्समिशन लाईन्स, पाईपलाईसारख्या सार्वजनिक वस्तूंच्या निर्मिती आणि विध्वंस गतिविधींवर प्रतिबंध असेल.


एनसीआरची राज्य सरकारे आणि दिल्ली सरकार सहावी, नववी आणि ११व्या इयत्तेच्या फिजीकल क्लास बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो आणि ऑनलाईन पद्धतीने क्लासेस घेतले जाऊ शकतात.


एनसीआर राज्य सरकारे/ दिल्ली सरकार सार्वजनिक आणि खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितींसह काम करण्याबाबत आणि बाकी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.


केंद्र सरकार आपल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी घरून काम करण्याबाबत विचार करण्यावर योग्य ते निर्णय घेतला जाऊ शकतो.

Comments
Add Comment

पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून ५८ लाख नावे वगळली

१२ लाखांहून अधिक मतदार ‘बेपत्ता’ असल्याचे विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत स्पष्ट कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये

भारताच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा! इथियोपियाच्या प्रतिष्ठीत ‘ग्रेट ऑनर निशान’ने पंतप्रधान मोदी सन्मानित

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथिओपिया देशाने ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित केले आहे. मोदींना

पहलगाम अतिरेकी हल्ला, एनआयएने ५८ मार्ग आणि शेकडो किमी. जंगलात तपास करुन दाखल केले आरोपपत्र

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा