दिल्ली-NCRमध्ये प्रदूषणाची स्थिती गंभीर, GRAP-4 लागू, या कामांवर बंदी

नवी दिल्ली: नवी दिल्लीमध्ये प्रदूषणाची(pollution) स्थिती दिवसेंदिवस अतिशय गंभीर होत चालली आहे. तेथील स्थिती पाहता हवेच्या गुणवत्ता प्रबंधन आयोगाने राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ग्रॅप (Graded Response Action Plan) चा चौथा टप्पा लागू केला आहे. सीएक्यूएम उप समितीने वायू गुणवत्तामध्ये आणखी घसरण रोखण्यासाठी टप्पा १, २ आणि ३ अंतर्गत सर्व कारवायांशिवाय तत्कालीन प्रभावाने पूर्ण एनसीआरमध्ये जीआरएपीचा टप्पा ४नुसार ८ सूत्रीय कार्य योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.


इलेक्ट्रिकल व्हेईकल, सीएनजी, बीएस ६ डिझेलशिवाय दिल्लीच्या बाहेर पंजीकृत छोट्या गाड्यांना राष्ट्रीय राजधानीमध्ये प्रवेशास अनुमती असणार नाही. आवश्यक वस्तू तसेच सेवा देणाऱ्या गाड्यांना यात सूट असेल.


दिल्लीमध्ये पंजीकृत मध्यम आणि भारी डिझेल माल वाहनांच्या संचलनावर बंदी असेल. आवश्यक वस्तू तसेच सेवा प्रदान करणाऱ्या वाहनांना सूट असेल.


राजमार्ग, रस्के, फ्लायओव्हर, ओव्हरब्रिज, पॉवर ट्रान्समिशन लाईन्स, पाईपलाईसारख्या सार्वजनिक वस्तूंच्या निर्मिती आणि विध्वंस गतिविधींवर प्रतिबंध असेल.


एनसीआरची राज्य सरकारे आणि दिल्ली सरकार सहावी, नववी आणि ११व्या इयत्तेच्या फिजीकल क्लास बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो आणि ऑनलाईन पद्धतीने क्लासेस घेतले जाऊ शकतात.


एनसीआर राज्य सरकारे/ दिल्ली सरकार सार्वजनिक आणि खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितींसह काम करण्याबाबत आणि बाकी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.


केंद्र सरकार आपल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी घरून काम करण्याबाबत विचार करण्यावर योग्य ते निर्णय घेतला जाऊ शकतो.

Comments
Add Comment

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत