दिल्ली-NCRमध्ये प्रदूषणाची स्थिती गंभीर, GRAP-4 लागू, या कामांवर बंदी

  109

नवी दिल्ली: नवी दिल्लीमध्ये प्रदूषणाची(pollution) स्थिती दिवसेंदिवस अतिशय गंभीर होत चालली आहे. तेथील स्थिती पाहता हवेच्या गुणवत्ता प्रबंधन आयोगाने राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ग्रॅप (Graded Response Action Plan) चा चौथा टप्पा लागू केला आहे. सीएक्यूएम उप समितीने वायू गुणवत्तामध्ये आणखी घसरण रोखण्यासाठी टप्पा १, २ आणि ३ अंतर्गत सर्व कारवायांशिवाय तत्कालीन प्रभावाने पूर्ण एनसीआरमध्ये जीआरएपीचा टप्पा ४नुसार ८ सूत्रीय कार्य योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.


इलेक्ट्रिकल व्हेईकल, सीएनजी, बीएस ६ डिझेलशिवाय दिल्लीच्या बाहेर पंजीकृत छोट्या गाड्यांना राष्ट्रीय राजधानीमध्ये प्रवेशास अनुमती असणार नाही. आवश्यक वस्तू तसेच सेवा देणाऱ्या गाड्यांना यात सूट असेल.


दिल्लीमध्ये पंजीकृत मध्यम आणि भारी डिझेल माल वाहनांच्या संचलनावर बंदी असेल. आवश्यक वस्तू तसेच सेवा प्रदान करणाऱ्या वाहनांना सूट असेल.


राजमार्ग, रस्के, फ्लायओव्हर, ओव्हरब्रिज, पॉवर ट्रान्समिशन लाईन्स, पाईपलाईसारख्या सार्वजनिक वस्तूंच्या निर्मिती आणि विध्वंस गतिविधींवर प्रतिबंध असेल.


एनसीआरची राज्य सरकारे आणि दिल्ली सरकार सहावी, नववी आणि ११व्या इयत्तेच्या फिजीकल क्लास बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो आणि ऑनलाईन पद्धतीने क्लासेस घेतले जाऊ शकतात.


एनसीआर राज्य सरकारे/ दिल्ली सरकार सार्वजनिक आणि खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितींसह काम करण्याबाबत आणि बाकी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.


केंद्र सरकार आपल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी घरून काम करण्याबाबत विचार करण्यावर योग्य ते निर्णय घेतला जाऊ शकतो.

Comments
Add Comment

चिनाब रेल्वे पूल आयफेल टॉवरपेक्षा उंच!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन काश्मिर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

नीट पीजी परीक्षा ३ ऑगस्टला

नवी दिल्ली : पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात नीट पीजी परीक्षेची

Elon Musk च्या स्टारलिंकला भारत सरकारची मंजुरी

नवी दिल्ली : Elon Musk च्या स्टारलिंक कंपनीला सॅटेलाइटच्या मदतीने इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारने मंजुरी दिली

ICICI Bank : अविश्वसनीय! ICICI बँकेत ४.५८ कोटींची फसवणूक, महिला मॅनेजरला अटक

जयपूर : बँकेत आपले पैसे सुरक्षित आहेत असं प्रत्येक ग्राहकाला वाटत असतं. पण, एका धक्कादायक प्रकरणात, राजस्थानच्या

जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर तिरंगा

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. चिनाब रेल्वे पूल हा जगातील

पर्वत आणि बोगद्यांमधील अभियांत्रिकीचा चमत्कार, चिनाब पुलामध्ये काय आहे खास पाहा

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच चिनाब पूल देशाला समर्पित केला. यासोबतच दोन वंदे भारत