World Cup Cup 2023 : टीम इंडियाचा स्टार खेळाडू दुखापतीमुळे वर्ल्डकपबाहेर; ‘या’ खेळाडूला दिला प्रवेश

Share

मुंबई : क्रिकेट वर्ल्डकपमध्ये (World Cup Cup 2023) भारतीय संघ (Team India) सध्या फॉर्ममध्ये असून सहा सामने जिंकत भारताने उपांत्य फेरीतील (Semi finals) आपला प्रवेश निश्चित केला आहे. भारताला ५ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेशी आणि १२ नोव्हेंबरला नेदरलँडशी असे अजून दोन सामने खेळावे लागणार आहेत. दरम्यान, भारताचा एक स्टार खेळाडू, उपकर्णधार आणि उत्तम गोलंदाज हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या वर्ल्डकपमध्ये खेळू शकणार नाही. बांगलादेशविरुद्ध (Bangladesh) झालेल्या सामन्यात पांड्याला दुखापत झाली होती. त्यावर सध्या उपचार सुरु असून तो सामना खेळू शकणार नाही.

बांगलादेशविरुद्ध १९ ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली होती. त्या सामन्यात तो केवळ तीन चेंडू टाकू शकला होता. पुनर्वसनासाठी तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत होता. त्यानंतर तीन सामने भारताने पांड्याशिवाय खेळले. पांड्याचे चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, यंदाचा वर्ल्डकप भारताला पांड्याशिवायच खेळावा लागणार आहे. त्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. ऑलराउंडर हार्दिक पांड्या विश्वचषकातील उर्वरित सामने खेळणार नाही.

भारतीय संघाचं उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित करण्यात हार्दिक पांड्याचा सिंहाचा वाटा होता. त्याच्यासारखा अनुभवी आणि अष्टपैलू खेळाडूने पुढील सामन्यांमध्ये नसणं, हे भारतासाठी खूप धक्कादायक आहे. हार्दिकच्या जागी आता प्रसिद्ध कृष्णाचा (Prasidh Krishna) संघात समावेश करण्यात आला आहे. प्रसिद्धला बॅकअप म्हणून तयार राहण्यास सांगण्यात आले आणि तो एनसीए बंगळुरू येथे होता.

ICC ने हार्दिकला वर्ल्ड कपमधून वगळण्याची पुष्टी केली. त्यानंतर शनिवारी स्पर्धेच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीकडून मान्यता मिळाल्यानंतर प्रसिद्ध कृष्णाचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. दरम्यान, प्रसिद्धला वर्ल्डकपचा अनुभव नाही. प्रथमच वर्ल्डकप संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याशिवाय भारताची उपांत्य फेरीतील खेळी किती दमदार असणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

8 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

8 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

9 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

10 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

10 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

10 hours ago